शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

लॉकडाऊन संपताच शहरांमधील बेरोजगारीचा दर होऊ लागला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:52 IST

सरकारची माहिती : यापूर्वी होते खासगी संस्थांचे सर्वेक्षण

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर - डिसेंबर २०२० या कालावधीत शहरांतील बेरोजगारीचा दर आदल्या तिमाहीच्या तुलनेत घटून १०.३ टक्के झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.एनएसओने दीर्घ काळापासून बेरोजगारीची आकडेवारी जारी केलेली नव्हती. या आकडेवारीसाठी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीसारख्या (सीएमआयई) खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागत होते. या अहवालासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या काळात अखिल भारतीय पातळीवर एकूण ५,५६३ यूएफएस ब्लॉकमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

एनएसओच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२०ला संपलेल्या तिमाहीत भारतातील बेरोजगारीचा दर १०.३ टक्के राहिला. त्याआधीच्या जुलै - सप्टेंबर २०२० या तिमाहीत तो १३.२ टक्के होता. आदल्या वर्षाच्या तुलनेत मात्र बेरोजगारीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २०१९ला संपलेल्या तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर एकअंकी ७.८ टक्के होता. अहवालात म्हटले आहे की, डिसेंबर २०२०च्या तिमाहीत शहरांतील सर्व वयोगटातील लोकांचा श्रमशक्ती सहभागिता दर ३७.३ टक्के राहिला. आदल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो ३७.२ टक्के होता. तसेच जुलै-सप्टेंबर २०२०च्या तिमाहीत तो ३७ टक्के होता. 

जून २०२०मध्ये सर्वाधिक बेरोजगारीएनएसओने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वित्त वर्ष २०२० - २१च्या एप्रिल - जून तिमाहीत बेरोजगारी सर्वाधिक २०.८ टक्के होती. या काळात कोविड-१९ साथीमुळे देशभरात सक्तीचे लॉकडाऊन सुरू होते.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार