शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यात भाजी व फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण समस्या : वाहनचालकांना चालताना होते अडचण; कारवाई करण्यात प्रशासन अपयशी

By admin | Updated: November 19, 2015 00:09 IST

जळगाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत मनपाचा अतिक्रमण विभाग मूग गिळून बसला असून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

जळगाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत मनपाचा अतिक्रमण विभाग मूग गिळून बसला असून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महात्मा गांधी मार्केट परिसरात दररोज शेकडो व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करतात. परंतु, त्यांनी अनधिकृतपणे तेथे उपलब्ध असलेल्या जागेवर सर्रासपणे अतिक्रमण थाटले आहेत.
नेहमीच होते वाहतुकीची कोंडी
टॉवर चौकापासून पुढे शनिपेठ पोलीस चौकीपर्यंत विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. विक्रेत्यांना बसण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे झेब्रा क्रॉसिंग प˜्या आखून देण्यात आल्या होत्या. मात्र, नियमांचे उल्लंघन करून विक्रेत्यांनी या प˜्यांच्या पुढेच दुकाने लावली आहेत. त्यामुळे या परिसररात दररोज वाहतुकीची कोंडी वारंवार होताना दिसते. त्यात टॉवर चौकातील सिग्नल यंत्रणा बर्‍याचदा बंद असते. त्यात वाहतुकीची कोंडीमुळे झाल्यानंतर नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागतो.
फेरीवाल्यांचा त्रास
महात्मा गांधी मार्केट परिसरात फेरीवाले विक्रेत्यांचा त्रास दिवसागणिक वाढत आहे. या परिसरातील बळीराम पेठ व शनीपेठ परिसरात अनेक फेरीवाले व्यवसाय करतात. अनेकदा या फेरीवाल्यांना वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचार्‍यांनी उठवून देतात. त्यामुळे ते विक्रेते त्यांचे बस्थान दुसरीकडे मांडतात. अशा परिस्थितीत फेरीवाल्यांना ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल. त्याच ठिकाणी ते अतिक्रमण करून त्यांचा व्यवसाय करतात.
खुल्या भूखंडावर मातीचे ढिग
महात्मा गांधी परिसरातील व्यापारी संकुलात खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना त्यांची वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नाही. या मार्केटच्या बाजूला महापालिकेचा खुला भूखंड गेल्या अनेक दिवसांपासून पडीक आहे. परंतु, या भूखंडावर कचरा व मातीचे मोठे ढिग टाकून ठेवल्यामुळे नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यातच उभी करावी लागतात. त्यात चारचाकी वाहनांचे चालक रस्त्याच्या मधोमध गाडी लावून खरेदीसाठी तासन्तास जात असल्याने रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.