शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दंतेवाडा चकमकीत मुरलीसह ३ नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर; २५ लाखांचे होते बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:00 IST

दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, तीन नक्षलवादी ठार

Chhattisgarh Naxal Encounter: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या दंतेवाडामध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. दंतेवाडा-विजापूर-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा दलांनी कुख्यात माओवादी सुधीर उर्फ ​​मुरली याच्यासह तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. झेराम हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या चैतूचाही चकमकीत मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. सुरक्षा दलांनी तीन मृतदेहांसह इन्सास रायफल ३०३ रायफल, १२ बोअरची बंदूक, स्फोटक साहित्य आणि दैनंदिन वापरातील इतर वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.

दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार झाले. दंतेवाडा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत २५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी सुधीर उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​मुरली मारला गेला. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये टॉप कमांडर मुरलीचाही समावेश असल्याचे सांगितले. मुरली उर्फ ​​सुधीर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य होता.

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळी ८ वाजता चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंकडून बराच वेळ गोळीबार सुरू होता. अनेक तासांच्या  गोळीबारानंतर सुरक्षा दलांनी जंगलात शोधमोहीम सुरू केली तेव्हा तीन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्याकडून विविध शस्त्रे देखील जप्त करण्यात आली. या कारवाईच्या एक दिवस आधीच ५०० जवान असलेले सुरक्षा दल जंगलात शोधमोहिमेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर या चकमकीची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, या कारवाईत नक्षलवादी चैतू उर्फ ​​श्यामही ठार झाल्याचे म्हटलं जात आहे. नक्षलवादी चैतू हा झेराम हल्ल्याचा सूत्रधार होता. गिरी रेड्डी असे नक्षलवादी चैतू उर्फ ​​श्यामचे नाव आहे. तो चैतू उर्फ ​​श्याम दादा या नावाने ओळखला जायचा. नक्षलवादी चैतू हा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. छत्तीसगडमधील नक्षल संघटनेत अनेक वर्षांपासून सक्रियपणे काम करत होता.

देशातील सर्वात मोठा नक्षलवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. २५ मे २०१३ रोजी नक्षलवाद्यांनी दर्भा येथील झेरामवर हल्ला केला होता.  या हल्ल्यात छत्तीगडमधील दिग्गज काँग्रेस नेते महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल यांच्यासह ३० जण मारले गेले होते. चैतू नवीन तरुणांना नक्षल संघटनेत भरती करायचा आणि प्रशिक्षणही द्यायचा. नक्षलवादी चैतूचा शोध दंतेवाडाच नाही तर सुकमा, विजापूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातही घेतला जात होता. अनेकवेळा तो चकमकीतून निसटला देखील होता.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी