शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

UP, बिहारच्या युवकांना अयोध्येत रोजगाराची संधी; हॉटेल उद्योगाला कामगारांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 17:13 IST

सध्या देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दररोज ५० हजार भक्त येतात

अयोध्या - प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. राम मंदिर हे देशभरातील तसेच जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लाखो पर्यटक दररोज अयोध्येत येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, २०३० पर्यंत दररोज पर्यटकांची संख्या ३ लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यामुळे हॉटेल उद्योगासाठी मोठ्या संधींची दारे खुली होत आहेत. 

अयोध्येबद्दल पंचतारांकित ते छोट्या हॉटेल्सपर्यंत तयारी सुरू झाली आहे. अयोध्येतील प्रचंड बाजारपेठ पाहून ताज, मॅरियट, सरोवर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, जेएलएल ग्रुप, रॅडिसन यासारखे मोठे हॉटेल ब्रँड अयोध्येत आपली हॉटेल्स बांधत आहेत. यासोबतच अयोध्येत छोटी हॉटेल्सही सुरू होत आहेत. शेकडो नवीन हॉटेल्स सुरू झाल्यामुळे अध्याध्येतील तसेच आसपासच्या तरुणांना हॉटेल मॅनेजर, फूड अँड बेव्हरेज मॅनेजर, रूम डिव्हिजन मॅनेजर, किचन मॅनेजर, हाऊसकीपिंग मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह शेफ, सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर, फ्रंट ऑफिस मॅनेजर, अशा नोकरीची संधी निर्माण होणार आहे. इन्व्हेंटरी मॅनेजर, हॉटेल रिसेप्शनिस्ट, बुकिंग एजंट, आयटी मॅनेजर, गार्ड इत्यादी प्रोफाइलमध्ये भरपूर नोकऱ्या उपलब्ध असतील.

हॉटेल उद्योगातील तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, श्री राम मंदिराच्या स्थापनेमुळे अयोध्या धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रभू रामाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ख्याती लक्षात घेता येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ही एक संजीवनी मानली जात आहे. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर अयोध्या शोधणाऱ्यांची संख्या सुमारे एक हजार टक्क्यांनी वाढली आहे. हे आकडे हॉटेल आणि इतर संबंधित क्षेत्रांसाठी आशा वाढवतात. पुढील काही वर्षांत अयोध्या दररोज येणाऱ्या  भक्तांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असेल. सध्या देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दररोज ५० हजार भक्त येतात. कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा सुट्टीच्या दिवशी ही संख्या एक लाखाच्या जवळपास पोहोचते असं या उद्योगाशी संबंधित लोक सांगतात.  

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येच्या विकासावर त्यांनी वैयक्तिक विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि दीपोत्सवासारख्या कार्यक्रमांद्वारे देशाचे आणि जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकाची संख्या सातत्याने वाढली आहे. पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१७ पर्यंत दरवर्षी साधारणपणे दोन लाख पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली. आता त्यांची संख्या दोन कोटी झाली आहे. पुढील काही वर्षे हॉटेल उद्योगात दरवर्षी २०००० ते २५००० लोकांना रोजगार मिळेल, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मुकेश मेश्राम यांच्या मते, २०३० पर्यंत दररोज सुमारे तीन लाख भक्त अयोध्येत येतील. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर काही आठवडे ही संख्या तीन ते सहा, सात लाखांच्या दरम्यान राहू शकते. ज्यांना राहायचे आहे त्यांना त्यांच्या बजेटनुसार, अयोध्येत हॉटेल्स, मोटेल, रेस्टॉरंट्स आणि वाहतूक सुविधांची आवश्यकता असेल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरjobनोकरी