शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रायगड संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:58 IST

आगामी विधानसभा निवडणुकपूर्वी रायगड किल्ल्याच्या संरक्षण-संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पीएमओ’ला साकडे घातले आहे. रायगडाच्या विकासासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयास सोमवारी केली.

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकपूर्वी रायगड किल्ल्याच्या संरक्षण-संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पीएमओ’ला साकडे घातले आहे. रायगडाच्या विकासासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयास सोमवारी केली.केंद्राच्या सहकार्यामुळे जीर्णोद्धाराचे काम लवकर पूर्ण होईल, अशी राज्य सरकारला आशा आहे. पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व खा. संभाजी राजे बैठकीस उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, रायगडाच्या विकासासाठी राज्य सरकारने ६०६ कोटी रूपयांचा आराखडा तयारकेला आहे. पुरातत्त्व विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्तपणे रायगडाचा विकास करतील. त्यासाठी काही कर्मचारी डेप्युटेशनवर राज्यात पाठवावेत, अशी विनंती केली आहे. किल्ला व परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, ध्वनी-प्रकाश शो यांसारखी कामे करण्यात येतील.झोपडपट्ट्यांना संरक्षणमुंबईतील झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. हा कायदा केंद्राकडे प्रलंबित आहे. राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नाही. त्यास लवकर मान्यता द्यावी. बळीराजा प्रेरणा अभियानातील प्रलंबित १०० सिंचन प्रकल्पांसाठी राज्याने केंद्राकडे निधी मागितला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. पंतप्रधान कार्यालयाने राज्याला त्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला होता. खर्चातील केंद्राचा वाटा लवकर देण्याची मागणी फडणवीस यांनी ‘पीएमओ’कडे केली. गतवर्षीचा खर्चही केंद्राने मंजूर केला आहे.>सामंजस्य करारऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षण, जतनाचा अनुभव नसल्याने पुरातत्त्व विभागाने कर्मचारी नियुक्त करण्याची विनंती पंतप्रधान कार्यालयास केली आहे. महिन्याभरात त्यासाठी सामंजस्य करार करण्यात येईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री>काम वेळेत पूर्ण होईलपुरातत्त्व विभागाने तटबंदीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवावे. शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ, राजसदनाच्या जीर्णोद्धाराचे काम मात्र पुरातत्त्व विभागानाचे करावे. कारण त्यांच्याकडे जास्त अनुभव आहे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल.- संभाजी राजे, खासदार

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस