शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

मोदींकडून आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा

By admin | Updated: June 26, 2017 01:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला. ती काळीकुट्ट रात्र विसरणे शक्य नाही, असे सांगून लोकशाहीच्या रक्षणासाठी सतत जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. १९७५ मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध लोकशाहीप्रेमी लोकांनी दिलेल्या लढ्याला उजाळा देताना त्यांनी लोकशाहीभिमुख वारसा बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. लोकशाही ही एक प्रणाली नाही, तर ती आमची संस्कृती असून, नित्य जागरूकता ही स्वातंत्र्याची किंमत आहे, असे ते म्हणाले. लोकशाहीवर प्रेम करणारी कोणतीही व्यक्ती विसरू शकणार नाही, अशी ती काळीरात्र होती. कोणताही भारतीय ती विसरू शकणार नाही. २५ जून १९७४ च्या त्या रात्री संपूर्ण देश तुरुंगात बदलून गेला होता. विरोधकांचा आवाज दाबला जात होता, असे ते म्हणाले.किदम्बीचे अभिनंदन-सरकारला कुठलीही वस्तू विकू इच्छिणाऱ्यांनी ई-जेमवर रजिस्टर करावे, गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस ई-जेमच्या माध्यमातून तुम्ही पारदर्शकता आणू शकाल, असे आवाहन मोदींनी केले. तसेच अंतराळ क्षेत्रात सातत्याने यशस्वी कामगिरी करीत असलेले इस्रोचे शास्रज्ञ आणि बॅडमिंटनमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या किदम्बी श्रीकांतचेही मोदींनी अभिनंदन केले.