शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आपल्याच घरी होईल वीजनिर्मिती... निम्म्या लोकांना ठाऊकच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 08:43 IST

उत्तम भौगोलिक परिस्थिती आणि वर्षभर मुबलक सूर्यप्रकाशामुळे देशात एकूण गरजेच्या तिप्पट सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकते.

ऋषिराज तायडे

मुंबई : उत्तम भौगोलिक परिस्थिती आणि वर्षभर मुबलक सूर्यप्रकाशामुळे देशात एकूण गरजेच्या तिप्पट सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकते. परंतु देशातील निम्म्याहून अधिक लोक या पर्यावरणपूरक ऊर्जास्रोताबद्दल अनभिज्ञ आहे. देशात अधिकाधिक सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी नुकतीच पंतप्रधान सूर्यघर योजनेची घोषणा करण्यात आली. त्यातून एक कोटी घरांवर सोलार पॅनल बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गरज २४० गिगावॉट, क्षमता ६३७ गिगावॉट

मुळात देशाची विजेची गरज ही २४० गिगावॉट आहे. परंतु देशातील एकूण २५ कोटी घरांवर सोलार पॅनल बसविल्यास वर्षभरात तब्बल ६३७ गिगावॉट ऊर्जानिर्मिती होऊ शकते.

सरसकट सर्वच घरांवर सोलार पॅनल बसविणे शक्य नसले, तरी किमान ११८ गिगावॉट सौर ऊर्जानिर्मिती तर निश्चितच करू शकतो.

केवळ ७३.३ गिगावॉट निर्मिती

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये १०० गिगावॉट सौर ऊर्जेची निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते.

परंतु पुरेशा जनजागृती अभावी मागील वर्षापर्यंत देशात केवळ ७३.३ गिगावॉट ऊर्जानिर्मिती सौर ऊर्जेच्या माध्यमातून होते. त्यापैकी २०% ऊर्जानिर्मिती निवासी प्रकल्पातून होते.

मोठा गुंतवणूक खर्च ही अडचण

सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी सुरुवातीला लागणारा मोठा खर्च तसेच त्याची देखभाल-दुरुस्ती कशी करावी, ही नागरिकामध्ये मोठी अडचण असल्याचे दिसते.

रुफटॉप सौर ऊर्जेतील टॉप १० राज्ये

राज्य   ऊर्जाक्षमता

गुजरात  २,८९८.१६

महाराष्ट्र १,७१६.३०

कर्नाटक १,५६२.११

राजस्थान       १,००२.४४

केरळ   ५१२.६७

हरयाणा ४८६.२३

तामिळनाडू      ४४९.२२

तेलंगणा ३४३.७८

पंजाब   २९८.९२

मध्य प्रदेश      २९६.०२

शहरी माहिती आहे

४२%

माहिती नाही

५८%

ग्रामीण माहिती आहे

४८%

माहिती नाही

५२%

टॅग्स :electricityवीज