शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय परिवेश बदलणारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:21 IST

भाजपचा हा विजय निर्भेळ आणि निर्णायक तर आहेच, पण अनेक अर्थांनी ऐतिहासिकही आहे.

- आशुतोष अडोणीThe Monk who sold every one's ferrari ! लोकसभा निवडणूक निकालांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर, याशिवाय समर्पक वाक्य सापडणार नाही.भाजपचा हा विजय निर्भेळ आणि निर्णायक तर आहेच, पण अनेक अर्थांनी ऐतिहासिकही आहे. विरोधकांचे विदारक मुखभंजन करून त्यांना अंतर्मुख व्हायला लावणारा, गेल्या पाच वर्षांत उत्पन्न केल्या गेलेल्या अनेक प्रश्नांना, जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या बुद्धिभ्रमांना व अपप्रचारांना उत्तर देणारा आणि देशाचा राजकीय परिवेश बदलवणारा हा अभूतपूर्व विजय आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रतिष्ठेसाठी जीवाचे रान करणाऱ्या परिश्रमी लोकनेत्याला आणि त्याच्या पारदर्शी, प्रामाणिक राज्यकारभाराला मिळालेला हा जनतेचा नि:संदिग्ध आशीर्वाद आहे.घराणेशाहीतून पोसला गेलेला उद्दाम अहंकार, बुद्धीच्या जोरावर न्यायालयांना वेठीस धरणारी अरेरावी, राजकारणासाठी देशसुरक्षेचा केलेला खेळ, सैनिकांचा अवमान, बालिश आरोपांचा तद्दन खोटा प्रचार, सत्तेसाठीचे घृणित जातीय राजकारण, हिंदू दहशतवादासारखे उभे केलेले थोतांड आणि सरतेशेवटी ईव्हीएमच्या निमित्ताने थेट लोकशाही प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवरच हेतुपुरस्सर केलेले निर्लज्ज प्रहार या सगळ्याच गोष्टींना या निकालांनी पार मोडीत काढले आहे. मुठी आवळून आझादी मागणाºया जेएनयूतल्या पोरांना डोक्यावर घेणाऱ्यांना त्या 'आझादी'सकट जनतेने आज घरी बसवले आहे.हा नि:संशय मोदी-शहांचा, त्यांच्या चाणाक्ष रणनीतीचा विजय आहे. त्यांनी विरोधकांना आपल्या पिचवर खेळायला लावलं. अजेंडा ते ठरवत गेले. पूर्वी भाजप प्रतिक्रियात्मक आणि रक्षात्मक पवित्र्यात असायचा. या वेळी विरोधक फरपटत गेले. सर्जिकल आणि एरियल स्ट्राइकवर शंका घेणे ही विरोधकांची घोडचूक होती. घरवापसी, मॉब लिंचिंग, रोहित वेमुला, जेएनयू, अवॉर्ड वापसी इत्यादी गोष्टी राज्य निवडणुकांच्या वेळी जोरात होत्या. या निवडणुकीत त्याचा पाचोळा झाला. राफेल हा सरकारनेच टाकलेला गुगली होता की काय असे वाटावे इतके विरोधक त्यात स्वत:च उघडे पडत गेले. महाराष्ट्रातील युतीच्या विजयाचे श्रेय मोदी लाटेसोबतच नितीन गडकरींचा विकासाचा झंझावात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ, प्रागतिक प्रतिमेला आणि लोकप्रियतेला द्यावे लागेल. गेल्या पाच वर्षांत सर्व अडचणींवर मात करून अतिशय कौशल्याने राज्यकारभार चालवताना त्यांनी ज्या चातुर्य आणि मुत्सद्दीपणाने शेवटच्या क्षणी युती घडवून आणली तो निवडणुकीचा टर्निंग पॉइंट होता. युतीच्या पाच वर्षांच्या कारभाराबरोबरच दुष्काळ हाही या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा राहण्याची शक्यता होती. पण विरोधकांना तो ऐरणीवर आणताच आला नाही.सर्वात लक्षणीय घडामोड म्हणजे भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला पाडलेले भगदाड. मोहिते पाटील, नाईक, निंबाळकर ही मातब्बर राजकीय घराणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपात आणली. विखे पाटलांबद्दल संशयकल्लोळ उभा केला. त्यातून आघाडीचे समीकरणच बदलले.लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील वैशिष्ट्य म्हणजे सत्तारूढ भाजप, सेना, रिपब्लिकन पार्टी, रासप, शिवसंग्राम आदी पक्षांच्या महायुतीने ही निवडणूक जशी सामूहिक नेतृत्वाच्या बळावर लढविली तशी ती काँग्रेस, राष्ट्रवादीला लढविता आली नाही. किंबहुना आघाडीचे नेतृत्व शरद पवार व राज ठाकरे हे नॉनप्लेइंग कॅप्टनच करीत होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रामदास जानकर, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हे खांद्याला खांदा भिडवून हिरिरीने प्रचार करीत होते. आघाडीमध्ये तसे चित्र अजिबात दिसत नव्हते. काँग्रेसची तर या निवडणुकीत खूपच फरपट झाली. तो पक्ष शरद पवारांनी अक्षरश: खिशात घातला होता. अगदी जागावाटपापासून ते काँग्रेसच्या तिकीटवाटपावरही शरद पवारांचाच वरचश्मा होता. प्रचाराची धुरा तर शरद पवार आणि आघाडीशी संबंध नसलेले आणि काँग्रेसने नाकारलेले राज ठाकरे यांनीच सांभाळली.दोन माजी मुख्यमंत्री आणि अनेक राजकीय घराण्यांची सद्दी संपवणाºया या निवडणूक निकालांचा राज्याच्या राजकारणावरील सर्वात मोठा परिणाम म्हणजे गलितगात्र झालेली काँग्रेस, अस्तित्वच पणाला लागलेली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसोबतची युती ही आपली अपरिहार्यता आहे याचे भान आलेली सेना, शरद पवारांच्या उत्तुंग राजकीय नेतृत्वाला लागलेली उतरती कळा आणि आपल्या राजकीय कारकिर्दीत कधी नव्हे तेवढे शक्तिशाली झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर ही छाया अधिक गडद होणार हे सांगणे न लगे.>हा नि:संशय मोदी, शहांचा आणि त्यांच्या चाणाक्ष रणनीतीचा विजय आहे. अजेंडा ते ठरवत गेले. पूर्वी भाजप प्रतिक्रियात्मक आणि रक्षात्मक पवित्र्यात असायचा. या वेळी विरोधक फरपटत गेले.(ब्लॉगर व सोशल मीडिया थिंकर)