शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"चुनावी भाषण...!" प्रियांका, अखिलेश ते शशी थरूर यांच्यापर्यंत...; पंतप्रधान मोदींच्या भाषणावर विरोधक भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 21:20 IST

"हे निवडणूक भाषण होते. उद्या दिल्लीत लोक मतदान करणार आहेत. याचा विचार करत ते बोलत होते. शहरी नक्षलवादासंदर्भात बोलणेही योग्य नव्हते."

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांवर थेट प्रहार केले. त्यांच्या भाषणानंतर आता विरोधकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. यासंदरभात काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी अपनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला वाटते, पंतप्रधान मोदी जनतेपासून आणि जनतेच्या गरजांपासून दूर गेले आहेत. आजच्या भाषणातून मला हेच जाणवले," असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "याचा आमच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. आपण घराणेशाहीच्या मुद्द्यावर वारंवार बोलला आहात. आपण राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलायला हवे होते. विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्यायला हवे होते. भाषण कसे द्यावे, हे पंतप्रधानांना माहित आहे. हे निवडणूक भाषण होते. उद्या दिल्लीत लोक मतदान करणार आहेत. याचा विचार करत ते बोलत होते. शहरी नक्षलवादासंदर्भात बोलणेही योग्य नव्हते."

सरकार आकडे लपवत  आहे : अखिलेश यादव -ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, कुंभ मेळ्यात एवढी मोठी घटना घडली, हा केवळ विरोधकांचाच प्रश्न नाही, तर संपूर्ण जगाने ते बघितले आहे. सरकार बेपत्ता आणि मृत लोकांचा आकडा लपवत आहे. आम्ही 2 मिनिटांचे मौन पाळण्याचे आवाहन केले होते. पण आज कोणीही त्याची पर्वा केली नाही. सरकारला जीविताच्या आणि मालमत्तेच्या नुकसानाची काहीही चिंता नाही.

लोकसभेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणावर काँग्रेस खासदार राजीव शुक्ला म्हणाले, "सोनिया गांधींवरील आरोप खोटे आहेत. प्रियंका गांधींनीही हे स्पष्ट केले आहे की, त्या राष्ट्रपतींचा आदर करतात आणि त्या असे काहीही म्हणाल्या नाहीत. खोटे पसरवले जात आहे आणि दुर्दैवाने पंतप्रधान मोदीही संसदेत त्याचा पुनरुच्चार करत आहेत. प्रत्येक वेळी गांधी कुटुंबाबद्दल अपशब्द बोलणे, हे भाषण आहे का?"

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधीShashi Tharoorशशी थरूरlok sabhaलोकसभा