शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 'सामना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 10:45 IST

राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून 6 मार्च रोजी

नवी दिल्ली - राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्रातील 7 जागांसह देशातील 17 राज्यांतील राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. या जागांवरील सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळेच, 26 मार्च रोजी या 55 जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. 

राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून 6 मार्च रोजी अर्ज उपलब्ध होणार आहेत. 13 मार्चपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. 16 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर, 18 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर, 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 55 जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे. तर मतदानादिवशीच म्हणजे 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन नवनिर्वाचित राज्यसभाखासदारांची घोषणा होईल. त्यामुळे, महाराष्ट्रातील भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांकडून आता नवीन सदस्यांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कारण, महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने सगळी गणिते बदलली आहेत. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMember of parliamentखासदार