शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

'निवडणूक रोख्यांची योजना म्हणजे फुसका बार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:39 IST

निवडणूक निधीसाठी केंद्र सरकारने अमलात आणलेली निवडणूक रोख्यांची योजना फुसका बार निघाली, अशी टीका माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केली आहे. 

जयपूर : निवडणूक निधीसाठी केंद्र सरकारने अमलात आणलेली निवडणूक रोख्यांची योजना फुसका बार निघाली, अशी टीका माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुका लढविण्यासाठी काळा पैसा वापरू नये हा उद्देश सफल व्हायच्याऐवजी त्या गैरकृत्यासाठी ही योजनाच सहाय्यभूत ठरली असेही ते म्हणाले. नवीन चावला यांनी लिहिलेल्या ‘एव्हरी व्होट काऊंट्स : दी स्टोरी ऑफ इंडियाज इलेक्शन' या पुस्तकाचे शनिवारी जयपूर लिटरेचन फेस्टिवलमध्ये प्रकाशन झाले. त्यावेळी पत्रकार एन. राम यांनी त्यांची मुलाखत घेतली.त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नवीन चावला म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत असो किंवा नोटाबंदीसारखे निर्णय घेतलेले असो, देशात काळ््या पैशाचा महासागर कायमच आहे. त्यातून राजकीय पक्षांना होणारा पैशाचा पुरवठा अजूनही थांबलेला नाही. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी आयोगाचा वचक निर्माण केला. त्यामुळे निवडणूक आयोग इतका स्वतंत्र बाण्याने काम करू लागला की, निवडणुकांच्या तारखा ठरविताना कार्यकारी मंडळाशी चर्चा करण्याची गरज भासली नाही. निवडणूक खर्चाची घालून दिलेली मर्यादा नेहमीच ओलांडली गेली आहे. जनतेचा आवाज बनण्याऐवजी राजकारणी संसदेच्या माध्यमातून श्रीमंत व सामर्थ्यशाली होण्याचा प्रयत्न करत आहेत. असे होणे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. निवडणुकांतील गैरप्रकार थांबायलाच हवेत, असेही चावला म्हणाले.अंतिम निकाल येईपर्यंत ईव्हीएमवर विश्वास ठेवा२०१० ते २०१४ या कालावधीत देशात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च केले. त्यातील निम्मा पैसा बेहिशेबी होता, असे सेंटर फॉर मीडिया स्टडीजने म्हटले आहे.त्याबद्दल नवीन चावला म्हणाले की, ही अतिशय चिंताजनक स्थिती आहे. ईव्हीएम हे संगणकांना जोडले नाहीत, तर त्यांचे हॅकिंग होण्याची शक्यता उरणार नाही. या यंत्रांविरोधात प्रदीर्घ न्यायालयीन लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल देईपर्यंत ईव्हीएमवर तूर्त विश्वास ठेवायला हवा.

टॅग्स :Electionनिवडणूक