शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार? निवडणूक आयुक्तांनी थेट वेळ सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:53 IST

पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला.

Jammu-Kashmir Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणामध्ये १ टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला.

या ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. तसेच निवडणूक आयोगाने सर्व ५ राज्यांचा दौरा केला. सरकारी संस्था, राज्य सरकार यांच्यासोबत बैठक घेतली. या ५ राज्यात ६७९ विधानसभा जागा आहेत. त्यात १६.१४ कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष मतदार तर ७.८ कोटी महिला मतदार आहेत. या राज्यांमध्ये ६० लाख असे मतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. 

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार?

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीबाबत विचारण्यात आले. यावर, सुरक्षा आणि अन्य निवडणुका लक्षात घेऊन योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षीच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जम्मू-काश्मीरच्या जनतेला विधानसभा निवडणुकीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, असे म्हटले जात आहे. 

दरम्यान, अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलसाठी (कारगिल) ४ ऑक्टोबर रोजी निवडणुका झाल्या, ज्याचे निकाल ८ सप्टेंबर रोजी आले. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि एनसीने एक तृतीयांश जागांवर कब्जा केला. येथे भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या १७ पैकी फक्त दोन उमेदवार विजयी होऊ शकले. जनतेने भाजपला नाकारल्याची टीका विरोधकांनी केली.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग