शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

UP Election 2017 : सपा यशाची पुनरावृत्ती करणार काय?

By admin | Updated: March 2, 2017 13:20 IST

समाजवादी पार्टीने प्रामुख्याने मध्य क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्रचंड बहुमतासह राज्यात सत्ता काबीज केली

लखनौ : उत्तर प्रदेशात २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने प्रामुख्याने मध्य क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्रचंड बहुमतासह राज्यात सत्ता काबीज केली होती. त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा सपा आपल्या यशस्वी कामगिरीची पुनरावृत्ती करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत सपाने एकूण ४०३ पैकी २२४ जागा जिंकल्या होत्या. राज्यातील यादवबहुल मध्य क्षेत्रात या पक्षाने आपल्या प्रतिस्पर्र्धींना धोबीपछाड देत एकूण ९८ पैकी ७६ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले होते. परंतु बहुजन समाज पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या बुंदेलखंडमध्ये मात्र पक्ष बसपाच्या तुलनेत मागे पडला होता. पश्चिम उत्तर प्रदेशात सपा आणि बसपात काट्याची टक्कर होती आणि या क्षेत्रात सपाला २९ तर बसपाला २८ जागा मिळाल्या होत्या. अर्थात पूर्वांचलमध्ये मात्र सपाने जबरदस्त कामगिरी करीत बसपाचे गर्वहरण केले होते. येथे सपाने १५० पैकी ८५ जागांवर कब्जा केला होता. इ.स. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने सोशल इंजिनीअरिंगच्या बळावर पूर्वांचलात ७९ जागा मिळविल्या होत्या. पण २०१२ मध्ये पक्षाची घसरण होत तो २५ जागांवर पोहोचला. २०१२ च्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, मध्य उत्तर प्रदेशातील निकालांनी विजयाचे गणित निश्चित केले होते. खरे तर हा यादवबहुल पट्टा मानला जातो. परंतु गेल्या निवडणुकीत सपाला येथे लॉटरीच लागली, असे म्हणता येईल. कारण या पक्षानेसुद्धा एवढ्या चांगल्या निकालांची अपेक्षा केली नव्हती. सपाने रुहेलखंडमध्येसुद्धा चांगली कामगिरी बजावली होती. या क्षेत्रात तिने ५२ पैकी २९ जागांवर विजयाची पताका फडकविली होती. बसपा मात्र येथे फारशी चांगली कामगिरी बजावू शकली नाही.(वृत्तसंस्था)

>सहाव्या टप्प्याचा प्रचार आज थांबणार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील प्रचार तोफा आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शांत होणार आहेत.या सहाव्या टप्प्यात सपाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांच्या लोकसभा मतदारसंघातील आजमगडसह पूर्वांचलच्या सात जिल्ह्यांमध्ये ४९ जागांसाठी ४ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचा प्रचार गुरुवारी सायंकाळी थांबेल. या टप्प्यात भाजपा खसदार महंत आदित्यनाथ यांच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघातही मतदान होईल.गोरखपूर येथे सर्वाधिक २३ उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वांत कमी ७ उमेदवार मऊ जिल्ह्याच्या मोहम्मदाबाद गोहना येथे नशीब आजमावत आहेत.या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये बसपा सोडून भाजपात आलेले स्वामी प्रसाद मौर्य, भाजपाचे सूर्यप्रताप शाही, श्याम बहादूर यादव, अंबिका चौधरी आणि नारद राय या दिग्गजांचा समावेश आहे.>२०१२-सपाची कामगिरी४०३ पैकी २२४ जागा - संपूर्ण राज्यात ९८ पैकी ७६ जागा - मध्य क्षेत्र५२ पैकी २९ जागा - रुहेलखंड>बुंदेलखंडात पराभवाचा सामनाराज्यातील सर्वात मागासलेले समजले जाणारे बुंदेलखंड हे एकमेव क्षेत्र असे आहे जेथे सपा माघारली होती. दुसरीकडे भाजपाने मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना येथील चरखारी क्षेत्रातून उमेदवारी देऊन या क्षेत्रात आपला जम बसविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो अपयशी ठरला. पश्चिमेतही काट्याची लढतपश्चिम उत्तर प्रदेशात सपा आणि बसपात काट्याची लढत झाली होती. हे क्षेत्र म्हणजे बसपाचा पारंपरिक गड मानला जात असला तरी, काही भागात भाजपा आणि राष्ट्रीय लोकदलाचाही दबदबा आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत सपाला मुस्लिमांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला होता.