शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

UP ELECTION 2017 : आम्ही करुन दाखवणार - राहुल गांधी

By admin | Updated: March 10, 2017 14:52 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात काँग्रेस - समाजवादी पक्षाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती घेण्यास एक दिवस शिल्लक असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात काँग्रेस - समाजवादी पक्षाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्ये उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात असल्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर काही बोलू शकत नाही असं सांगितलं. राहुल गांधी बोलले आहेत की, 'एक्झिट पोलची परिस्थिती बिहारसारखी होईल. आमची युती जिंकत आहे. असे एक्झिट पोल आम्ही बिहारमध्येदेखील पाहिले आहेत. यावर उद्या बोलू'.
 
(UP Electiom 2017 : ...म्हणून सट्टा बाजारात भाजपा 'फेव्हरेट')
(यूपीसह चार राज्यांत कमळ; पंजाबमध्ये सत्तांतर अटळ !)
(एक्झिट पोलमध्ये मोदी लाट कायम)
 
पाच राज्यांच्या विधानसभांची मतमोजणी शनिवारी सकाळी होणार असली तरी विविध एक्झिट पोलचे निकाल आले असून, ते खरे निघाल्यास देशात मोदी लाट कायम असल्याचे दिसते. उत्तर प्रदेश व मणिपूरमध्ये भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल. पंजाबमध्ये काँग्रेस व ‘आप’मध्ये अटीतटीच्या लढतीची शक्यता एक्झिट पोल्सनी व्यक्त केली आहे. उत्तराखंडात भाजपाला बहुमत मिळेल, असे निष्कर्ष काही एक्झिट पोल्समध्ये आहेत, तर काहींनी तिथे काँग्रेसला कसेबसे बहुमत मिळू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मणिपूर व गोव्यातही भाजपाला बहुमत मिळेल, असे एक्झिट पोल सांगतात.
 
राहुल गांधी यांनी बिहारचा हवाला देत एक्झिट पोलच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केला आहेत. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने एक्झिट पोल पुर्णपणे बोगस असल्याचं सांगितलं आहे. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी सांगितलं आहे की, 'एक्झिट पोल बदलण्यासाठी काही चॅनेल्सवर दबाव टाकण्यात आला असल्याची माझ्याकडे माहिती आहे'.
 
एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची पिछेहाट होताना दिसल्यावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी धर्मनिरपेक्ष एकतेचा पत्ता खोलला आहे. जातीय ताकदींना रोखायचं असेल तर धर्मनिरपेक्ष ताकदींना एकत्र येण्याची गरज असल्याचं अखिलेश यादव बोलले आहेत. मायावतीच्या बहुजन समाज पक्षाकडे त्यांचा सरळ इशारा होता. 
 
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांपैकी केवळ गोव्यात आता भाजपाचे सरकार होते. तिथे तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल व्यक्त करीत आहेत. पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर भाजपा सत्तेत होती. पण तिथे दोन्ही पक्ष दणकून मार खातील आणि काँग्रेस व आप यांच्यापैकी एकाला बहुमत मिळेल, असे हे पोल सांगतात. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षाला ११0 ते १६९च्या दरम्यान जागा मिळतील, असे हे पोल म्हणतात. तिथे भाजपाला १५५ ते २१0च्या दरम्यान जागा मिळतील, असे या सर्व्हेवरून दिसते. केवळ एकाच पोलमध्ये तिथे भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी अन्य पोलनुसार भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, पण बहुमत मात्र मिळणार नाही, असे दिसते. मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण तो पक्ष तिथे मागे पडेल, असे पोल सांगतात. म्हणजेच आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर ईशान्येकडील आणखी एका राज्यात भाजपा शिरकाव करेल.
 
हे पोल जाहीर होत असतानाच अखिलेश यादव यांनी आम्ही उत्तर प्रदेशात कदापि भाजपाचे सरकार बनू देणार नाही, त्यासाठी प्रसंगी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीशी समझोता करू, असे बीबीसीला सांगितले आहे. याचाच अर्थ सपाला बहुमत मिळणार नाही, हे जणू त्यांनी मान्यच केल्याचे दिसते.