शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2017 - विरोधकांचा एक्झिट पोलवर विश्वास नाही

By admin | Updated: March 11, 2017 00:19 IST

पाच राज्यांच्या विधानसभा निकालांबाबत एक्झिट पोलचे निष्कर्ष गुरूवारी वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर दिल्लीचे राजकीय तापमान वाढले आहे. शुक्रवारी संसदेतही याचा प्रत्यय आला.

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

पाच राज्यांच्या विधानसभा निकालांबाबत एक्झिट पोलचे निष्कर्ष गुरूवारी वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर दिल्लीचे राजकीय तापमान वाढले आहे. शुक्रवारी संसदेतही याचा प्रत्यय आला. सर्वच राजकीय नेत्यांचे सारे लक्ष ११ मार्चच्या निकालांवर केंद्रित झाले असल्याने सेंट्रल हॉलमधे त्यावरच गप्पांचे फड रंगले होते. संसदेच्या प्रांगणात समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव म्हणाले की, आम्ही १00 टक्के जिंकतो आहोत. आमची पक्की माहिती आहे की एक्झिट पोलच्या आकडेवारीत बदल करण्यासाठी वाहिन्यांवर भरपूर दबाव आणला गेला . राहुल गांधी म्हणाले की, बिहार निवडणुकीच्या निकालांपूर्वीही असेच एक्झिट पोल जाहीर झाले होते. निकालानंतर त्यातला फोलपणा सर्वांना समजला. उत्तर प्रदेशात आमचीच आघाडी सत्तेवर येईल. उद्या निकालानंतर याबाबत अधिक मी बोलेन. राज्यसभा सदस्य नरेश अग्रवाल म्हणाले, उत्तर प्रदेशात बहुमतसमाजवादी आणि काँग्रेस आघाडीलाच मिळणार आहे. संभाव्य निकालांमध्ये आम्हाला कमी लेखण्याचे षडयंत्र नेमके कोणी कोणी रचले, याचा खुलासा ११ मार्चच्या निकालानंतर आम्ही जरूर करू. मुलायमसिंग म्हणाले की, कोणत्याही पोलवर विश्वास ठेवू नका. मला खात्री आहे की सपा आणि काँग्रेस आघाडीलाच बहुमत मिळेल, आणि अखिलेश यादवच मुख्यमंत्री होतील.एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री अखिलेश यादवांनी बहुमत आपल्या आघाडीलाच मिळेल, असा दावा करतानाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी मायावती यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर मायावतींनीही समाजवादी पक्षाबद्दल नरमाईचे संकेत दिले. त्यावर सपाचे नरेश अग्रवाल म्हणाले की, अखिलेशच्या विधानांचा अर्थ राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो असा आह. भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ मात्र काहीशा संतप्त स्वरात म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजपला कोणत्याही आघाडीची गरज नाही. राज्यातल्या सर्व वर्गाची मते आम्हाला मिळाली आहेत. भाजपच्या हाती पूर्ण बहुमताचे सरकार सोपवण्याचा निर्णय राज्यातल्या जनतेने कधीच घेतला आहे. बसपशी तडजोड करण्याआधी लखनौच्या सरकारी विश्रामगृहावर मायावतींवर १९९५ साली हल्ला कोणी चढवला, त्याचे उत्तर अखिलेश यादवांनी द्यावे.या स्कॅमचीही चौकशी व्हावी- एक्झिट पोल आणि सट्टा बाजार यांनी संगनमत करून गुरूवारी अंदाज व्यक्त केले. सपा व काँग्रेसच्या बाजूने बेटिंग करायचे आणि दुसऱ्या सट्टा बाजारात भाजपला सत्ता मिळणार यावर जुगार खेळायचा. - अशी आकडेवारी जाहीर केल्याबद्दल वाहिन्यांच्या मालकांना भरपूर पैसेही कमवता येतात. साहजिकच सर्वांनाच आर्थिक लाभ मिळवून देणारा संभाव्य निकालांचा हा बाजार आहे, असे मत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या ज्येष्ठ पत्रकाराने सर्वांना ऐकवले.- असे केल्यास एका ठिकाणी हरलेले पैसे नुकसान न होता दुसऱ्या ठिकाणी वसूल होतात. त्याचबरोबर सर्वत्र भाजपच विजयी होणार, असा मानसिक दबावही निकालापर्यंत जनतेवर ठेवता येतो. - सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग व बेटिंगच्या चौकशीसाठी बीसीसीआयची चौकशी केली, त्याच धर्तीवर निवडणुकांच्या निकालपूर्व बाजार मांडून देशाची आर्थिक लूट व मानसिक फसवणूक करणाऱ्या एक्झिट पोल स्कॅमचीही चौकशी व्हायला हवी, असे तो पत्रकार म्हणाला, तेव्हा सर्व पक्षांचेच खासदार अवाक झाले.