शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
4
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
5
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
6
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
7
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
8
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
9
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
10
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
11
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
12
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
13
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
14
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
15
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
16
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
18
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
19
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
20
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

UP ELECTION 2017 - प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार

By admin | Updated: March 11, 2017 15:26 IST

काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या करिअरमध्ये मोठा यू-टर्न येण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या अभूतपूर्व यशात रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा होता. किशोर यांच्यामुळेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपानं घवघवीत यश मिळवलं होतं. मात्र त्यानंतर प्रशांत किशोर आणि अमित शाह यांच्यात वादाच्या घटना समोर आल्या आणि प्रशांत किशोर यांनी कमळाची साथ सोडून दिली. उत्तर प्रदेश निवडणुकीतही काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकांनंतर काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या करिअरमध्ये मोठा यू-टर्न येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधल्या पराभवानंतर काँग्रेस त्यांना दूर ठेवण्याच्या विचारात आहे. याआधी प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळेच काँग्रेसचा आसाम राज्यात पराभव झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी व्यापक रणनीती आखली होती. लखनऊमधल्या वॉर रूममध्ये काँग्रेसच्या विजयाची रणनीती ठरवण्यात आली होती. प्रशांत किशोर टीमच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येक बुथवर जाऊन विश्लेषण केलं होतं. प्रत्येक बुथनुसार जातीयवाद आणि धार्मिक मतांचा आकडा तयार करण्यात आला आहे. तिकीटवाटपातही या मतांना डोळ्यासमोर ठेवून उमेदवारांना तिकीट देण्यात आलं होतं. प्रशांत किशोर यांची टीम 500 लोकांचं काम करत असल्याचीही चर्चा होती. मात्र आसामसारखी उत्तर प्रदेशातही प्रशांत किशोर यांची रणनीती सपशेल अपयशी ठरली आहे. तसेच काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी करण्यातही प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याप्रमाणेच अखिलेश आणि राहुल यांच्या रॅलीचं प्रत्येक भाषण प्रशांत किशोरच लिहीत होते. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्यासोबत बिहारमध्ये काम केलं होतं. प्रशांत किशोर यांनी नीतीशकुमार यांच्यासोबत बिहारमध्ये व्यापक प्रचार अभियानही राबवलं होतं. तसेच नीतीशकुमार यांच्या विजयात प्रशांत किशोर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला विजय मिळवून देण्यात आखलेल्या रणनीतीला अपयश आलं असून, आरएसएसच्या रणनीतीसमोर प्रशांत किशोर घायाळ झाले आहेत. काँग्रेसचं 15 वर्षांनंतरही उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.