शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 19:22 IST

महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? याचा विचार करा असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

दिल्ली - मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. बेताल वक्तव्य करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पडणार आहे, हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत ते सरकारमध्ये राहतील. धमकीला कुणी घाबरत नाही. जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं मी पाहतो असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडून आलेले तुमच्या आमदारांना विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर ही आघाडी कधीच झाली नसती. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. ही आघाडी फारकाळ टिकणार नाही. केवळ सत्तास्थापनेसाठी ही आघाडी झाली. भाजपा-शिवसेना आमदारांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी होते. त्यामुळे आमदार, खासदारांना निर्णय घ्यावाच लागणार होता अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर दिली आहे. 

तसेच महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? त्यांना विचारात घेतले असते तर ही आघाडी आणि बंडखोरी झालीच नसती. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्ती शिवरायांच्या विचाराची वारस आहे. परकीय आक्रमणाला कुणी भीक घातली नाही. कुणीतरी फुटकळ बेताल वक्तव्य करतायेत ते धमक्यांची भाषा करत असतील त्याला भीक घालणार नाही. जे कुणी धमकी देत आहेत त्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात उदयनराजे यांनी शिंदे यांना धमकी देणाऱ्यांना इशारा दिला आहे. 

हा तर रडीचा डाव - एकनाथ शिंदेजे अल्पमतात त्यांनी नोटीस पाठवणं म्हणजे रडीचा डाव अशा शब्दात बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी  शिवसेनेला टोला लगावला आहे. शिंदे गटाची बैठक होणार असून या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. काही अपक्ष आमदारही आहेत. पुढची रणनीती बैठकीत ठरेल. बैठकीनंतर पुढचे सर्व निर्णय घेतले जातील. लोकशाहीत कायद्याला, घटनेला आणि नियमाला महत्त्व आहे. जे अल्पमतात आहेत त्यांनी अशाप्रकारे नोटिसा पाठवणे हे हास्यास्पद आहे. रडीचा डाव आहे. अपात्र करण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही. कायद्यानुसार ते शक्य नाही असा टोला शिंदेंनी लगावला आहे. 

तसेच आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर रणनीती ठरवू. नियमानुसार लोकशाहीनुसार पावले उचलली जातील. कितीही नोटीस पाठवल्या तरीही घाबरणार नाही. घाबरतंय कोण? विधानसभेत ज्या नियमानुसार गोष्टी आहेत त्या कराव्याच लागतील. गटनेते नेमले आहेत ते पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे ४० हून जास्त आणि १२ अपक्ष अशाप्रकारे संख्याबळ ५० आमदारांच्या पुढे गेले आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे