शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 19:22 IST

महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? याचा विचार करा असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

दिल्ली - मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. बेताल वक्तव्य करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पडणार आहे, हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत ते सरकारमध्ये राहतील. धमकीला कुणी घाबरत नाही. जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं मी पाहतो असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडून आलेले तुमच्या आमदारांना विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर ही आघाडी कधीच झाली नसती. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. ही आघाडी फारकाळ टिकणार नाही. केवळ सत्तास्थापनेसाठी ही आघाडी झाली. भाजपा-शिवसेना आमदारांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी होते. त्यामुळे आमदार, खासदारांना निर्णय घ्यावाच लागणार होता अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर दिली आहे. 

तसेच महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? त्यांना विचारात घेतले असते तर ही आघाडी आणि बंडखोरी झालीच नसती. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्ती शिवरायांच्या विचाराची वारस आहे. परकीय आक्रमणाला कुणी भीक घातली नाही. कुणीतरी फुटकळ बेताल वक्तव्य करतायेत ते धमक्यांची भाषा करत असतील त्याला भीक घालणार नाही. जे कुणी धमकी देत आहेत त्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात उदयनराजे यांनी शिंदे यांना धमकी देणाऱ्यांना इशारा दिला आहे. 

हा तर रडीचा डाव - एकनाथ शिंदेजे अल्पमतात त्यांनी नोटीस पाठवणं म्हणजे रडीचा डाव अशा शब्दात बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी  शिवसेनेला टोला लगावला आहे. शिंदे गटाची बैठक होणार असून या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. काही अपक्ष आमदारही आहेत. पुढची रणनीती बैठकीत ठरेल. बैठकीनंतर पुढचे सर्व निर्णय घेतले जातील. लोकशाहीत कायद्याला, घटनेला आणि नियमाला महत्त्व आहे. जे अल्पमतात आहेत त्यांनी अशाप्रकारे नोटिसा पाठवणे हे हास्यास्पद आहे. रडीचा डाव आहे. अपात्र करण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही. कायद्यानुसार ते शक्य नाही असा टोला शिंदेंनी लगावला आहे. 

तसेच आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर रणनीती ठरवू. नियमानुसार लोकशाहीनुसार पावले उचलली जातील. कितीही नोटीस पाठवल्या तरीही घाबरणार नाही. घाबरतंय कोण? विधानसभेत ज्या नियमानुसार गोष्टी आहेत त्या कराव्याच लागतील. गटनेते नेमले आहेत ते पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे ४० हून जास्त आणि १२ अपक्ष अशाप्रकारे संख्याबळ ५० आमदारांच्या पुढे गेले आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे