शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 19:22 IST

महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? याचा विचार करा असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

दिल्ली - मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. बेताल वक्तव्य करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पडणार आहे, हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत ते सरकारमध्ये राहतील. धमकीला कुणी घाबरत नाही. जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं मी पाहतो असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडून आलेले तुमच्या आमदारांना विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर ही आघाडी कधीच झाली नसती. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. ही आघाडी फारकाळ टिकणार नाही. केवळ सत्तास्थापनेसाठी ही आघाडी झाली. भाजपा-शिवसेना आमदारांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी होते. त्यामुळे आमदार, खासदारांना निर्णय घ्यावाच लागणार होता अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर दिली आहे. 

तसेच महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? त्यांना विचारात घेतले असते तर ही आघाडी आणि बंडखोरी झालीच नसती. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्ती शिवरायांच्या विचाराची वारस आहे. परकीय आक्रमणाला कुणी भीक घातली नाही. कुणीतरी फुटकळ बेताल वक्तव्य करतायेत ते धमक्यांची भाषा करत असतील त्याला भीक घालणार नाही. जे कुणी धमकी देत आहेत त्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात उदयनराजे यांनी शिंदे यांना धमकी देणाऱ्यांना इशारा दिला आहे. 

हा तर रडीचा डाव - एकनाथ शिंदेजे अल्पमतात त्यांनी नोटीस पाठवणं म्हणजे रडीचा डाव अशा शब्दात बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी  शिवसेनेला टोला लगावला आहे. शिंदे गटाची बैठक होणार असून या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. काही अपक्ष आमदारही आहेत. पुढची रणनीती बैठकीत ठरेल. बैठकीनंतर पुढचे सर्व निर्णय घेतले जातील. लोकशाहीत कायद्याला, घटनेला आणि नियमाला महत्त्व आहे. जे अल्पमतात आहेत त्यांनी अशाप्रकारे नोटिसा पाठवणे हे हास्यास्पद आहे. रडीचा डाव आहे. अपात्र करण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही. कायद्यानुसार ते शक्य नाही असा टोला शिंदेंनी लगावला आहे. 

तसेच आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर रणनीती ठरवू. नियमानुसार लोकशाहीनुसार पावले उचलली जातील. कितीही नोटीस पाठवल्या तरीही घाबरणार नाही. घाबरतंय कोण? विधानसभेत ज्या नियमानुसार गोष्टी आहेत त्या कराव्याच लागतील. गटनेते नेमले आहेत ते पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे ४० हून जास्त आणि १२ अपक्ष अशाप्रकारे संख्याबळ ५० आमदारांच्या पुढे गेले आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे