शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हृदयस्पर्शी! ...म्हणून 8 वर्षांच्या चिमुकल्यावर आली रिक्षा चालवण्याची वेळ; डोळे पाणावणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:17 IST

Eight year old boy of blind Andhra couple drives auto : गोपाळ कृष्ण असं या आठ वर्षांच्या मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीमध्ये शिकतो.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. मात्र आता अशातच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या चिमुकल्यावर रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांचं पोट भरण्यासाठी हैद्राबादमधील अवघ्या आठ वर्षांचा मुलगा ई-रिक्षा चालवत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने शाळेचा ड्रेस परिधान करून या चिमुकल्याला ई-रिक्षा चालवताना पाहिलं. तो दोन जणांना घेऊन जात होता. हे पाहताच त्या व्यक्तीला थोडा धक्का बसला. त्या व्यक्तीने रिक्षा थांबवली आणि याबाबत विचारणा केली. तेव्हा चिमुकल्याने आपल्यावर आलेल्या परिस्थितीची माहिती दिली. 

गोपाळ कृष्ण असं या आठ वर्षांच्या मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीमध्ये शिकतो. कुटुंबाला जगवण्यासाठी, त्यांचं पालनपोषण कऱण्यासाठी हैद्राबादमध्ये ई-रिक्षा चालवत असल्याची माहिती मुलाने दिली आहे. या चिमुकल्याचे आई-वडील दोघेही दिव्यांग आहेत. आणि त्याला भाऊ-बहीण देखील आहेत. या सर्वांच्यात गोपाळ मोठा आहे. त्यामुळे घरच्या सर्वांची जबाबदारी ही त्याच्यावर आहे. गोपाळ कृष्णने अभ्यास करुन झाला की मी माझ्या आई-बाबांना ई-रिक्षामधून घेऊन जातो असं सांगितलं आहे. 

मोठा मुलगा या नात्याने माझ्या कुटुंबाची मदत करणं ही माझी जबाबदारी असल्याचं देखील त्याने म्हटलं आहे. गोपाळ कृष्णचे दिव्यांग आई-वडील हे चंद्रगिरी शहरात वेगवेगळ्या भागात भाजीपाला आणि किराणा माल विकतात. गोपाळच्या वडिलांनी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही दृष्टिहीन आहोत. आम्हाला तीन मुलं आहेत आणि मोठा मुलगा त्याचा अभ्यास संपवून आम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करतो असं म्हटलं आहे. या दोघांची ही तिन्ही मुलं शारिरीकदृष्ट्या सुदृढ आहेत आणि हे दाम्पत्य आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घेत आहे. 

केवळ आठ वर्षांचा चिमुकला चालवतोय रिक्षा

गोपाळच्या वडिलांनी आम्हाला असं वाटतं की सरकारने आमची पेन्शन वाढवायला हवी. सध्या आम्हाला पेन्शन म्हणून फक्त तीन हजार रुपये मिळतात, आणखी मदत करा असं म्हटलं आहे. गोपाळ कृष्ण आपल्या आईबाबांना चंद्रगिरी शहरात सोडतो जिथे ते आपल्याकडच्या वस्तू विकतात. काही दिवसांपूर्वीच त्याला पोलिसांनी पकडलंही होतं आणि तो हे वाहन पुन्हा चालवणार नाही असं आश्वासन घेऊन त्याला सोडलं असल्याचं म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाIndiaभारत