शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नशिराबाद येथे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
पत्रकाचा आशय असा- पाणीप्रश्न युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून शेळगाव बॅरेज पाणी आणून शुद्धीकरणाची योजनेचे काम राजकीय द्वेषातून बंद होते; मात्र त्याबाबत पाठपुरावा करून गती देण्यास आम्हीच प्रयत्न केले असून जलशुद्धीकरणाच्या जलवाहिन्यांचे काम ७० टक्के झाले असून जॅकवेलचे काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणत आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठी योजनेच्या कामाची गती मंदावण्यासाठी संभाव्य अडचणी व धोका काय होईल हे जाहीर न करता व कुठलेही मार्गदर्शन न घेता जलवाहिन्यांच्या मार्गात बदल करण्याची मागणी होत असल्याचा आक्षेप रोटे यांनी घेतला आहे. परिणामी कामास विलंब होईल, मार्च अखेरपर्यंत योजनेचा निधी खर्च न झाल्यास योजनेचा निधी परत जाऊन काम रखडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गावातील जलवाहिन्यांची गळती, दुरुसती, तोट्या बसविणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य दिले असून एमआयडीसीच्या ४ कोटी ९५ लाख ८३५ रुपयांची थकबाकीमुळे एमआयडीसीचे पाणी मिळण्यास अडचणी येत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्त्रोताच्या जवळील ५०० मीटर अंतरावरील विहिरी व इतर पाणीसाठे यांचेतील पाणी वापरावर निर्बंध आणून अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोटे यांनी पत्रकात म्हटले आहे. १ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतीतर्फे पाणी वाचवा अभियान गाव पातळीवर राबविणार आहे. पाणी वापराबाबत जनजागृती करण्यासोबत विविध बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. (वार्ताहर)