शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबाद येथे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
पत्रकाचा आशय असा- पाणीप्रश्न युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून शेळगाव बॅरेज पाणी आणून शुद्धीकरणाची योजनेचे काम राजकीय द्वेषातून बंद होते; मात्र त्याबाबत पाठपुरावा करून गती देण्यास आम्हीच प्रयत्न केले असून जलशुद्धीकरणाच्या जलवाहिन्यांचे काम ७० टक्के झाले असून जॅकवेलचे काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणत आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठी योजनेच्या कामाची गती मंदावण्यासाठी संभाव्य अडचणी व धोका काय होईल हे जाहीर न करता व कुठलेही मार्गदर्शन न घेता जलवाहिन्यांच्या मार्गात बदल करण्याची मागणी होत असल्याचा आक्षेप रोटे यांनी घेतला आहे. परिणामी कामास विलंब होईल, मार्च अखेरपर्यंत योजनेचा निधी खर्च न झाल्यास योजनेचा निधी परत जाऊन काम रखडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गावातील जलवाहिन्यांची गळती, दुरुसती, तोट्या बसविणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य दिले असून एमआयडीसीच्या ४ कोटी ९५ लाख ८३५ रुपयांची थकबाकीमुळे एमआयडीसीचे पाणी मिळण्यास अडचणी येत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्त्रोताच्या जवळील ५०० मीटर अंतरावरील विहिरी व इतर पाणीसाठे यांचेतील पाणी वापरावर निर्बंध आणून अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोटे यांनी पत्रकात म्हटले आहे. १ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतीतर्फे पाणी वाचवा अभियान गाव पातळीवर राबविणार आहे. पाणी वापराबाबत जनजागृती करण्यासोबत विविध बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. (वार्ताहर)