शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

नशिराबाद येथे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
पत्रकाचा आशय असा- पाणीप्रश्न युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून शेळगाव बॅरेज पाणी आणून शुद्धीकरणाची योजनेचे काम राजकीय द्वेषातून बंद होते; मात्र त्याबाबत पाठपुरावा करून गती देण्यास आम्हीच प्रयत्न केले असून जलशुद्धीकरणाच्या जलवाहिन्यांचे काम ७० टक्के झाले असून जॅकवेलचे काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणत आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठी योजनेच्या कामाची गती मंदावण्यासाठी संभाव्य अडचणी व धोका काय होईल हे जाहीर न करता व कुठलेही मार्गदर्शन न घेता जलवाहिन्यांच्या मार्गात बदल करण्याची मागणी होत असल्याचा आक्षेप रोटे यांनी घेतला आहे. परिणामी कामास विलंब होईल, मार्च अखेरपर्यंत योजनेचा निधी खर्च न झाल्यास योजनेचा निधी परत जाऊन काम रखडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गावातील जलवाहिन्यांची गळती, दुरुसती, तोट्या बसविणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य दिले असून एमआयडीसीच्या ४ कोटी ९५ लाख ८३५ रुपयांची थकबाकीमुळे एमआयडीसीचे पाणी मिळण्यास अडचणी येत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्त्रोताच्या जवळील ५०० मीटर अंतरावरील विहिरी व इतर पाणीसाठे यांचेतील पाणी वापरावर निर्बंध आणून अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोटे यांनी पत्रकात म्हटले आहे. १ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतीतर्फे पाणी वाचवा अभियान गाव पातळीवर राबविणार आहे. पाणी वापराबाबत जनजागृती करण्यासोबत विविध बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. (वार्ताहर)