शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
3
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
4
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
5
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
6
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
7
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
8
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
9
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
10
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
11
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
12
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
13
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
14
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
15
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
16
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
17
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
18
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
19
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
20
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू

‘गरिबांच्या योजना प्रभावीपणे राबवा’

By admin | Updated: August 28, 2016 00:37 IST

केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व भाजपा प्रदेशाध्यक्षांची एक बैठक शनिवारी दिल्लीत झाली. बैठकीच्या उद्घाटन सत्रात शाह यांनी सांगितले की, सध्या भाजपा देशातील ५७ टक्के भूभागावर, तसेच ३७ टक्के लोकसंख्येवर राज्य करत आहे. मोदी सरकारकडून गरिबांसाठी सुमारे ८0 योजना राबविल्या जातात. त्यापैकी ६५ योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर आहे. अशा परिस्थितीत भाजपाशासित राज्यांची या कल्याणकारी योजनांच्या यशात महत्त्वाची भूमिका आहे. मे २0१४ मध्ये केंद्रात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर अशा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांनी राज्य शाखांच्या कोअर समितीची बैठक घेतली. या बैठकीत ‘गरिबांचे हित आणि सुशासन’ या विषयीचा अजेंडा ठेवण्यात आला. सध्या भाजपा दलित आणि अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचाराच्या घटनांमुळे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे. अशा कठीण प्रसंगी कल्याणकारी योजना आणि गरिबांवर विशेष लक्ष दिल्यास राजकीय संकटातून वाचता येऊ शकेल, असे भाजपात मानले जात आहे. शाह यांनी सांगितले की, भाजपाने देशात कामकाजाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. भाजपाची राज्यांतील सरकारे केवळ आपल्या चांगल्या कामाच्या बळावर वारंवार निवडून आली आहेत. गरिबांसाठी कल्याणकारी राज्य बनविणे आणि सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे, ही केंद्र आणि राज्य सरकारांची संयुक्त जबाबदारी आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)वसुंधरा राजे गैरहजरया महत्त्वाच्या बैठकीला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे मात्र गैरहजर राहिल्या. त्यांनी स्वत: येण्याऐवजी ज्येष्ठ मंत्र्यांना बैठकीला पाठविले होते. भाजपाशासित मुख्यमंत्र्यांची ही पहिली बैठक होती.