शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: July 6, 2016 00:43 IST

जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

मानधनावर नियुक्ती करा : शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ, पंचभाई यांनी दिला आंदोलनाचा इशाराभंडारा : जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असल्या तरी यात मात्र काही शाळा शिक्षकाविना असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदच्या शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे रिक्त जागेवर तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे.भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या झालेल्या बदल्यामध्ये जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकारी यांचे मध्ये सुसुत्रतेचा अभाव कोणताही मागचा पुढचा विचार न केल्याने पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या बदल्या केल्यामुळे काही शिक्षक बदलीच्या ठिकाणी रूजू झाले तर काही शिक्षकाकडून आपल्या मुळच्याच ठिकाणावर आहेत. काही बदली होवूनही आदेश मिळूनही नवीन ठिकाणी रूजू झाले नाहीत. यात महिला शिक्षकांची फार मोठी समस्या आहे. मुख्य रस्त्यावर असलेले गाव आपल्याला मिळावे यासाठी लाखोंचा घोडाबाजार झाल्याची चर्चा आहे. तशी खुद्द चर्चा शिक्षकांमध्ये आहे.शिक्षकांच्या बदल्या विरोधात शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या. ज्यांना सोयीचे ठिकाण मिळाले ते तत्काळ रूजू झाले. जे बाजाराचे मुल्य देवूनही योग्य ठिकाण न मिळाल्यामुळे जागेवर स्थिर आहेत. या घोळात काही शाळांत अधिक तर काही शाळात एकही नाही. महलिा शिक्षकांना बऱ्याच लांबून ये-जा करावा लागत असल्याने वर्षभरात येण्या-जाण्याचा खर्चाचा हिशोब करून लाखो रूपये मोजायला तयार शिक्षक तयार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत अगोदरच विद्यार्थी संख्या कमी असल्याने बऱ्याच शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही शाळा अखेरची घटका मोजत आहेत. या बदल्यासंदर्भात केव्हा विचार करतील व चिमुकल्या मुलांना केव्हा शिक्षक मिळतील?, शिक्षक मिळणार की नाही हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना शिक्षक मिळाले नाही तरी गरीबांच्या मुलांची खासगी शाळेत शिकण्याची ऐपत नसल्याने ‘शिकवा की नका शिकवू आम्ही जिल्हा परिषद शाळेतच जाणार’ असे बोलके चित्र पवनी तालुक्यात पहावयास मिळत आहे. पवनी तालुक्यातील निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे तुनतुने वाजवणारे पुढारी शाळेसाठी आवाज का काढत नाही, असा प्रश्न जनता करीत आहे.सदर प्रकरणा संदर्भात पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाला भेट देवून शहानिशा केली. यात बरीच पदे रिक्त असल्याचे लक्षात आले. यामध्ये केंद्र प्रमुखाची दोन पदे, शिक्षक विस्तार अधिकारी दोन पदे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पाच पदे, पदवीधर शिक्षक, विस्तार अधिकारी दोन पदे, पदवीधर शिक्षक १५, सहायक शिक्षक १४, वरिष्ठ सहायक एक व परिचर एक अशी पदे रिक्त आहेत. यावर तोडगा काढावा, अशी मागणी तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)