शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: July 6, 2016 00:43 IST

जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

मानधनावर नियुक्ती करा : शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ, पंचभाई यांनी दिला आंदोलनाचा इशाराभंडारा : जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असल्या तरी यात मात्र काही शाळा शिक्षकाविना असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदच्या शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे रिक्त जागेवर तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे.भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या झालेल्या बदल्यामध्ये जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकारी यांचे मध्ये सुसुत्रतेचा अभाव कोणताही मागचा पुढचा विचार न केल्याने पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या बदल्या केल्यामुळे काही शिक्षक बदलीच्या ठिकाणी रूजू झाले तर काही शिक्षकाकडून आपल्या मुळच्याच ठिकाणावर आहेत. काही बदली होवूनही आदेश मिळूनही नवीन ठिकाणी रूजू झाले नाहीत. यात महिला शिक्षकांची फार मोठी समस्या आहे. मुख्य रस्त्यावर असलेले गाव आपल्याला मिळावे यासाठी लाखोंचा घोडाबाजार झाल्याची चर्चा आहे. तशी खुद्द चर्चा शिक्षकांमध्ये आहे.शिक्षकांच्या बदल्या विरोधात शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या. ज्यांना सोयीचे ठिकाण मिळाले ते तत्काळ रूजू झाले. जे बाजाराचे मुल्य देवूनही योग्य ठिकाण न मिळाल्यामुळे जागेवर स्थिर आहेत. या घोळात काही शाळांत अधिक तर काही शाळात एकही नाही. महलिा शिक्षकांना बऱ्याच लांबून ये-जा करावा लागत असल्याने वर्षभरात येण्या-जाण्याचा खर्चाचा हिशोब करून लाखो रूपये मोजायला तयार शिक्षक तयार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत अगोदरच विद्यार्थी संख्या कमी असल्याने बऱ्याच शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही शाळा अखेरची घटका मोजत आहेत. या बदल्यासंदर्भात केव्हा विचार करतील व चिमुकल्या मुलांना केव्हा शिक्षक मिळतील?, शिक्षक मिळणार की नाही हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना शिक्षक मिळाले नाही तरी गरीबांच्या मुलांची खासगी शाळेत शिकण्याची ऐपत नसल्याने ‘शिकवा की नका शिकवू आम्ही जिल्हा परिषद शाळेतच जाणार’ असे बोलके चित्र पवनी तालुक्यात पहावयास मिळत आहे. पवनी तालुक्यातील निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे तुनतुने वाजवणारे पुढारी शाळेसाठी आवाज का काढत नाही, असा प्रश्न जनता करीत आहे.सदर प्रकरणा संदर्भात पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाला भेट देवून शहानिशा केली. यात बरीच पदे रिक्त असल्याचे लक्षात आले. यामध्ये केंद्र प्रमुखाची दोन पदे, शिक्षक विस्तार अधिकारी दोन पदे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पाच पदे, पदवीधर शिक्षक, विस्तार अधिकारी दोन पदे, पदवीधर शिक्षक १५, सहायक शिक्षक १४, वरिष्ठ सहायक एक व परिचर एक अशी पदे रिक्त आहेत. यावर तोडगा काढावा, अशी मागणी तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)