शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पंजाबमधील ३ पोलिसांना २३ वर्षांनी शिक्षा

By admin | Updated: October 9, 2016 00:27 IST

महिलांना अमानवी वागणूक दिल्याप्रकरणी अमृतसरमधील तीन पोलिसांना न्यायालयाने तुरुंगवास ठोठावला. या पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी तीन महिलांच्या कपाळावर

पतियाळा : महिलांना अमानवी वागणूक दिल्याप्रकरणी अमृतसरमधील तीन पोलिसांना न्यायालयाने तुरुंगवास ठोठावला. या पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी तीन महिलांच्या कपाळावर ‘जेब कतरी’ ‘खिसेकापू’ गोंदवले होते. विशेष न्यायमूर्ती बलजिंदरसिंग यांनी पोलीस अधीक्षक सुखदेवसिंग चिन्ना व पोलीस उपनिरीक्षक नरिंदरसिंग यांना ३ वर्षांचा, तर सहायक फौजदार कंवलजितसिंग यांना एक वर्षाचा कारावास ठोठावला. या महिला खिसे कापताना पकडल्या गेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कपाळावर ‘जेब कतरी’ असे गोंदवले. चोरीच्या प्रकरणात न्यायालयात त्या चौघींना आणले असता पोलिसांनी या चौघींचे कपाळ ओढणीने झाकले; मात्र एकीने कपाळावरील गोंदलेली अक्षरे न्यायाधीशांना दाखविली आणि त्यानंतर ही घटना राष्ट्रीय मुद्दा बनली. पंजाब पोलीस टीकेचे धनी झाले. सरकारने त्यांच्या कपाळावरील गोंदलेले काढण्यासाठी प्लास्टिक सर्जरीही केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल मागितला. आयोग या प्रकरणात १९९४ मध्ये उच्च न्यायालयात स्वत:हून पक्षकार बनला. आयोगाच्या मागणीवरून याची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली. सीबीआयने २०१५ मध्ये याची चौकशी सुरू करून दोषारोपपत्र दाखल केले होते. ‘आम्ही सुवर्णमंदिराकडे जात होतो, तेव्हा सहायक फौजदार कंवलजितसिंग यांनी आम्हाला अडवून अटक केली आणि नंतर पोलिसांनी आमच्या कपाळावर जेब कतरी असे गोंदवले’, असे या महिलांनी न्यायालयात सांगितले. या महिलांनी पुन्हा चोरी करू नये म्हणून शेजाऱ्यांनी त्यांच्या कपाळावर जेब कतरी असे गोंदवले होते, असा दावा पोलिसांनी केला होता. (वृत्तसंस्था)