शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

मानहानी खटल्यात मुख्य संपादक, संचालक आरोपी होत नाहीत; केरळ हायकोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 06:09 IST

प्रसार माध्यमाचे मुख्य संपादक आणि संचालकांना त्यांची विशिष्ट भूमिका दर्शविल्याशिवाय मानहानीच्या प्रकरणात अडकवले जाऊ शकत नाही.

- खुशालचंद बाहेती तिरुवनंतपुरम : प्रसार माध्यमाचे मुख्य संपादक आणि संचालकांना त्यांची विशिष्ट भूमिका दर्शविल्याशिवाय मानहानीच्या प्रकरणात अडकवले जाऊ शकत नाही. भारतीय दंड संहितेत त्यांच्यावर अप्रत्यक्ष उत्तरदायित्वाची कोणतीही तरतूद नाही, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. ३ ऑगस्ट २०१७ रोजी, इंडिया टुडे टीव्हीने राजेशच्या हत्येतील माणिककुटन हा मुख्य आरोपी दर्शविणारी एक बातमी प्रसारित केली. मात्र, चॅनलमध्ये दाखवण्यात आलेला फोटो माणिककुटनऐवजी अनिल कुमारचा होता. ही बातमी सुमारे तीन दिवस याच छायाचित्रासह प्रसारित झाल्यानंतर इंडिया टुडेचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य संपादक आणि इतरांना यासंदर्भात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली.नंतर अनिल कुमार यांनी आयपीसीच्या कलम ४९९, ५०० अंतर्गत अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य संपादक आणि इंडिया टुडे लिमिटेडचे मालक यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. न्यायालयाने त्याची दखल घेत आरोपींना समन्स काढले. मुख्य संपादक, व्यवस्थापकीय संचालक आणि इतरांविरुद्ध कोणताही गुन्हा स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद करून या तक्रारीतील पुढील सर्व कार्यवाही रद्द करण्याची मागणी करत सर्वांनी उच्च  न्यायालयात धाव घेतली.आरोपी हे इंडिया टुडे लि.चे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य संपादक आणि मालक आहेत या आरोपाव्यतिरिक्त, बातमी निवडण्यात, संपादित करण्यात आणि प्रसारित करण्यात त्यांची कोणती विशिष्ट भूमिका आहे याचा तक्रारीत पुराव्यासह उल्लेख नाही, सर्व आरोप सर्वसाधारण स्वरूपाचे  आहेत, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाने के. एम. मॅथ्यू विरुद्ध केरळ राज्य यात मुख्य संपादक, व्यवस्थापकीय संचालक यांचे नाव वर्तमानपत्रात छापले असले, तरी गुन्हा घडवण्यात त्यांची भूमिका दर्शविणारा विशिष्ट पुरावा नसेल तर त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही, असा निकाल दिला आहे. याचा आधार घेत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती झियाद रहमान ए. ए. यांनी स्पष्ट केले की, कंपनीच्या संचालकांवर अप्रत्यक्ष उत्तरदायित्वाची आयपीसीमध्ये कोणतीही तरतूद नाही. सामान्यत: एखाद्या व्यक्तीवर फौजदारी आरोप ठेवण्यासाठी अशा व्यक्तीने सहेतुक गुन्हा करण्यात काही भूमिका बजावली होती, हे स्पष्ट असले पाहिजे.याला एकमेव अपवाद म्हणजे अप्रत्यक्ष उत्तरदायित्व. जोपर्यंत कायद्यात अशी विशेष तरतूद नाही, तोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर अप्रत्यक्ष गुन्हेगारी उत्तरदायित्व निश्चित केले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाची कार्यवाही रद्द केली.