शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

अर्थव्यवस्था संकटात नाही; वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 05:08 IST

अर्थव्यवस्थेत हिरवे कोंब फुटत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. हिरव्या कोंबांचे संकेत देणारे असे सात निदर्शक अर्थव्यवस्थेत दिसून येत आहेत.

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था कोणत्याही संकटात नाही. हिरवे कोंब दिसून येत असून देश झपाट्याने ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले.

लोकसभेत अर्थव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी म्हटले की, विदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे. कारखाना उत्पादन वाढत आहे. मागील तीन महिन्यांपासून जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांच्या वर गेलेले आहे. विदेशी चलनाचा साठा सार्वकालिक उच्चांकावर आहे. शेअर बाजार तेजीत आहे. अर्थव्यवस्थेत हिरवे कोंब फुटत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. हिरव्या कोंबांचे संकेत देणारे असे सात निदर्शक अर्थव्यवस्थेत दिसून येत आहेत.

सीतारामन यांनी सांगितले की, वृद्धीला चालना देणाऱ्या चार क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. खाजगी गुंतवणूक, निर्यात आणि खाजगी व सार्वजनिक उपभोग यांचा त्यात समावेश आहे. सार्वजनिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारने डिसेंबरमध्ये ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन’ची घोषणा केली आहे. आगामी चार वर्षांत म्हणजेच २०२४-२५ पर्यंत पायाभूत विकासासाठी १.०३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार आहे. उपभोग वाढावा यासाठी २०१९-२० च्या रबी आणि खरीप हंगामातील सर्व पिकांच्या किमान आधारभूत किमतींत वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्था