शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अर्थव्यवस्था संकटात नाही; वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 05:08 IST

अर्थव्यवस्थेत हिरवे कोंब फुटत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. हिरव्या कोंबांचे संकेत देणारे असे सात निदर्शक अर्थव्यवस्थेत दिसून येत आहेत.

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था कोणत्याही संकटात नाही. हिरवे कोंब दिसून येत असून देश झपाट्याने ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले.

लोकसभेत अर्थव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी म्हटले की, विदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे. कारखाना उत्पादन वाढत आहे. मागील तीन महिन्यांपासून जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांच्या वर गेलेले आहे. विदेशी चलनाचा साठा सार्वकालिक उच्चांकावर आहे. शेअर बाजार तेजीत आहे. अर्थव्यवस्थेत हिरवे कोंब फुटत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. हिरव्या कोंबांचे संकेत देणारे असे सात निदर्शक अर्थव्यवस्थेत दिसून येत आहेत.

सीतारामन यांनी सांगितले की, वृद्धीला चालना देणाऱ्या चार क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. खाजगी गुंतवणूक, निर्यात आणि खाजगी व सार्वजनिक उपभोग यांचा त्यात समावेश आहे. सार्वजनिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारने डिसेंबरमध्ये ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन’ची घोषणा केली आहे. आगामी चार वर्षांत म्हणजेच २०२४-२५ पर्यंत पायाभूत विकासासाठी १.०३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार आहे. उपभोग वाढावा यासाठी २०१९-२० च्या रबी आणि खरीप हंगामातील सर्व पिकांच्या किमान आधारभूत किमतींत वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्था