शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

देशातील रोजगाराचा आकडा जाहीर; सहा वर्षांत 2.62 कोटी लोकांना मिळाली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 15:14 IST

सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या काळात देशातील शहरी आणि ग्रामीण भागात 2.62 कोटी लोकांना नोकरी मिळाली. ही आकडेवारी संघटीत क्षेत्रातील आहे.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019-20 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. या सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या कालावधीत देशातील 2.62 कोटी लोकांना नवीन रोजगार मिळाल्याचे समोर आले आहे.

सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या काळात देशातील शहरी आणि ग्रामीण भागात 2.62 कोटी लोकांना नोकरी मिळाली. ही आकडेवारी संघटीत क्षेत्रातील आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार नोव्हेंबर 2019 पर्यंत एकूण 69.03 लाख लोकांना पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत नोकरी मिळाली. तर मागील सहा वर्षांच्या काळात महिला रोजगारामध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संघटीत क्षेत्रात अधिक नोकऱ्या उपलब्ध करणे तसेच गुणवत्तेत सुधारणा करण्यावर सरकारचा फोकस होता. त्यामुळे नियमीत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाटा 2010-11 च्या 18 टक्क्यांच्या तुलनेत 2017-18 मध्ये 23 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये एकूण 2.62 कोटी नोकऱ्या देण्यात आल्या. यामध्ये 1.21 कोटी नोकऱ्या ग्रामीण आणि 1.39 कोटी नोकऱ्या शहरी भागात देण्यात आल्या आहेत.

सर्व्हेनुसार 2019-20 या सरत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 5 टक्के राहिला आहे. तर 2020-21 या आगामी आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.50 टक्के राहील, असा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.