शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

देशातील रोजगाराचा आकडा जाहीर; सहा वर्षांत 2.62 कोटी लोकांना मिळाली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 15:14 IST

सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या काळात देशातील शहरी आणि ग्रामीण भागात 2.62 कोटी लोकांना नोकरी मिळाली. ही आकडेवारी संघटीत क्षेत्रातील आहे.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019-20 या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. या सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या कालावधीत देशातील 2.62 कोटी लोकांना नवीन रोजगार मिळाल्याचे समोर आले आहे.

सर्व्हेनुसार 2011-12 ते 2017-18 या काळात देशातील शहरी आणि ग्रामीण भागात 2.62 कोटी लोकांना नोकरी मिळाली. ही आकडेवारी संघटीत क्षेत्रातील आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार नोव्हेंबर 2019 पर्यंत एकूण 69.03 लाख लोकांना पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत नोकरी मिळाली. तर मागील सहा वर्षांच्या काळात महिला रोजगारामध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संघटीत क्षेत्रात अधिक नोकऱ्या उपलब्ध करणे तसेच गुणवत्तेत सुधारणा करण्यावर सरकारचा फोकस होता. त्यामुळे नियमीत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाटा 2010-11 च्या 18 टक्क्यांच्या तुलनेत 2017-18 मध्ये 23 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये एकूण 2.62 कोटी नोकऱ्या देण्यात आल्या. यामध्ये 1.21 कोटी नोकऱ्या ग्रामीण आणि 1.39 कोटी नोकऱ्या शहरी भागात देण्यात आल्या आहेत.

सर्व्हेनुसार 2019-20 या सरत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 5 टक्के राहिला आहे. तर 2020-21 या आगामी आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.50 टक्के राहील, असा अंदाज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.