शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

पृथ्वीराजबाबांच्या नेतृत्वाला ग्रहण

By admin | Updated: October 17, 2014 02:56 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस नेतृत्व नाराज असल्याचे संकेत आहेत़

काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे वारे : महाराष्ट्र केंद्रस्थानी
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस नेतृत्व नाराज असल्याचे संकेत आहेत़ राज्यातील विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी चव्हाण यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना आरोपींच्या पिंज:यात उभे केल़े हे पक्षावर उलटल्याचे पक्षश्रेष्ठीचे मत आह़े त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला कौल मिळाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी नवा चेहरा येणो निश्चित मानले जात आह़े निकाल येणो अद्याप बाकी असले आणि निकाल काहीही लागला तरी पक्षश्रेष्ठी या मतावर ठाम राहतील, असा सूत्रंचा दावा आहे.  
 काँग्रेसमध्ये संघटनेत फेरबदलाचे वारे वाहू लागले असून पक्षनेतृत्वाने या दिशेने चिंतन सुरू केले आह़े उच्चपदस्थ सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बिहारच्या जिल्हाध्यक्षांसोबत बुधवारी  चर्चा केली़ यानंतर वरिष्ठ पक्षनेत्यांशी चर्चा करून फेरबदलाच्या दिशेने प्राथमिक तयारी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिल़े तत्पूर्वी पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सोनियांना पक्ष सदस्यत्व मोहिमेच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली़
 बिहार काँग्रेसचे बहुतांश जिल्हाध्यक्ष प्रभारी सरचिटणीस सीपी जोशी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांना हटविण्याची मागणी घेऊन दिल्लीत पोहोचले होत़े आपल्या मागणीसाठी काँग्रेस मुख्यालयापुढे धरणो देण्याची त्यांची योजना होती़ मात्र द्विवेदी यांनी महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुका बघता त्यांना यापासून परावृत्त केल़े शिवाय सोनिया गांधी यांच्यासमक्ष आपले गा:हाणो मांडण्याची संधी देण्याचे आश्वासनही त्यांना देण्यात आल़े त्यानुसार बिहारच्या नेत्यांनी सोनियांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपवल़े या निवेदनात अशोक चौधरी यांना तात्काळ हटविण्याची मागणी केली आह़े यावेळी सोनियांनी यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची ग्वाही दिली़
पक्षसूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ बिहारच नाही तर महाराष्ट्र आणि अन्य राज्ये तसेच राष्ट्रीय स्तरावरही फेरबदलाची तयारी काँग्रेसमध्ये सुरू झाली आह़े विशेष म्हणजे, राहुल समर्थकांना पक्षाची धुरा सोपविण्याच्या चर्चेलाही सोनियांनी विराम दिला आह़ेज्येष्ठ नेत्यांना डावलून युवा नेत्यांना पुढे आणण्याच्या प्रयत्नात काँग्रेसच्या वाटय़ाला केवळ निराशा आली आह़े त्यामुळे पक्षनेतृत्वाने यादिशेनेही मोठय़ा फेरबदलाचे संकेत दिले आहेत़
 
अनवधानाने बोललो, दिलगिरीही व्यक्त
पुणो - ‘टेलिग्राफ’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांच्याबाबत आपण अनवधानाने बोलून गेल्याचा खुलासा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केला. आपण त्यावर दिलगिरी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. 
मुलाखत संपल्यावर विश्लेषणात्मक गप्पा मारतानाचे छुपे रेकॉर्डिग केल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. कराडहून मुंबईला जाताना पुण्यात थांबल्यावर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले,‘टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आदर्श घोटाळ्याबाबत आपण बोललो नव्हतो. परंतु मुलाखत संपल्यानंतर झालेल्या विश्लेषणात्मक अनौपचारिक गप्पाही त्यांनी कॅमे:यामध्ये छुप्या 
पद्धतीने रेकॉर्ड केल्या. हे कितपत योग्य आहे?’