शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

बिहारात रालोआला बंडखोरीचे ग्रहण

By admin | Updated: September 17, 2015 01:11 IST

रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे (लोजपा) खासदार रामकिशोरसिंग यांनी बुधवारी पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असतानाच तिकीट

पाटणा : रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे (लोजपा) खासदार रामकिशोरसिंग यांनी बुधवारी पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असतानाच तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्याने बिहारमध्ये रालोआला जबर हादरा बसला आहे.वैशाली लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामकिशोरसिंग यांनी लोजपाच्या सरचिटणीस आणि संसदीय पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी राजस्थानमधील प्रभारी सरचिटणीसपदाचा पदभारही सोडला. ते दीर्घकाळापासून पासवानांचे निकटस्थ राहिले आहेत. रालोआसोबत जागावाटप करताना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याने ते नाराज होते. रामकिशोरसिंग यांची नाराजी दूर केली जाईल, असे संसदीय पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी अलीकडेच म्हटले होते; मात्र परिस्थितीत कोणताही बदल न झाल्यामुळे त्यांनी सर्व पदाचा राजीनामा देण्याचे पाऊल उचलले. रामकिशोरसिंग यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसाद सिंग यांचा धक्कादायक पराभव केला होता. (वृत्तसंस्था) भाजपच्या दोन आमदारांचा बंडाचा झेंडा- तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले भाजपचे दोन आमदार अमनकुमार आणि अजय मंडल यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेत धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. मला तिकीट नाकारण्यात आल्यामुळे नितीशकुमार यांनीही आश्चर्य व्यक्त केल्याचे भागलपूर जिल्ह्यातील पीरपैनती (राखीव) मतदारसंघाचे आमदार अमनकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. अजय मंडल हे त्याच जिल्ह्यातील नाथनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.