शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राहुल गांधी भारतीय नागरिक, निवडणूक अर्ज ठरला वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:03 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता.

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक आयोगासमोर झालेल्या 2 तासांच्या सुनावणीनंतर हे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेत. 

राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाकडून चौकशी करण्यात आली. सोमवारी या आक्षेपावर निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात तब्बल दोन तास ही सुनावणी सुरु होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. त्यानंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांनी केलेले दावे फेटाळून लावले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. 

राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर अमेठी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी आक्षेप नोंदवला होता. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची आहे. राहुल गांधी यांच्याकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात येत आहे असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांकडून करण्यात आला होता. यानंतर  राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला होता. 

शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये राहुल गांधी यांच्या वकीलांनी अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोमवारपर्यंतची वेळ मागून घेण्यात आली होती. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी पार पडली. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा अपक्ष उमेदवाराने दावा केला होता. यावर काँग्रेसकडून काहीच उत्तर आलं नव्हतं. राहुल गांधी यांच्या कायदेशीर सल्लागारांनी शनिवारी निवडणूक आयोगासमोर या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला त्यामुळे यावर शंका उपस्थित करून भाजपानेही राहुल गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र आज झालेल्या दोन तासांच्या सुनावणीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019