शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
3
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
4
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
5
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
6
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
7
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
8
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
9
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
10
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
12
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
13
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
14
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
15
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
16
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
17
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
18
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
19
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
20
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी भारतीय नागरिक, निवडणूक अर्ज ठरला वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:03 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता.

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक आयोगासमोर झालेल्या 2 तासांच्या सुनावणीनंतर हे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेत. 

राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाकडून चौकशी करण्यात आली. सोमवारी या आक्षेपावर निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात तब्बल दोन तास ही सुनावणी सुरु होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. त्यानंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांनी केलेले दावे फेटाळून लावले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. 

राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर अमेठी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी आक्षेप नोंदवला होता. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची आहे. राहुल गांधी यांच्याकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात येत आहे असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांकडून करण्यात आला होता. यानंतर  राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला होता. 

शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये राहुल गांधी यांच्या वकीलांनी अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोमवारपर्यंतची वेळ मागून घेण्यात आली होती. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी पार पडली. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा अपक्ष उमेदवाराने दावा केला होता. यावर काँग्रेसकडून काहीच उत्तर आलं नव्हतं. राहुल गांधी यांच्या कायदेशीर सल्लागारांनी शनिवारी निवडणूक आयोगासमोर या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला त्यामुळे यावर शंका उपस्थित करून भाजपानेही राहुल गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र आज झालेल्या दोन तासांच्या सुनावणीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019