शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राहुल गांधी भारतीय नागरिक, निवडणूक अर्ज ठरला वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:03 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता.

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने आणि अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक आयोगासमोर झालेल्या 2 तासांच्या सुनावणीनंतर हे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेत. 

राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोगाकडून चौकशी करण्यात आली. सोमवारी या आक्षेपावर निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात तब्बल दोन तास ही सुनावणी सुरु होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला. त्यानंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांनी केलेले दावे फेटाळून लावले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. 

राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर अमेठी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी आक्षेप नोंदवला होता. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची आहे. राहुल गांधी यांच्याकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात येत आहे असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांकडून करण्यात आला होता. यानंतर  राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला होता. 

शनिवारी झालेल्या सुनावणीमध्ये राहुल गांधी यांच्या वकीलांनी अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोमवारपर्यंतची वेळ मागून घेण्यात आली होती. त्यामुळे ही सुनावणी सोमवारी पार पडली. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा अपक्ष उमेदवाराने दावा केला होता. यावर काँग्रेसकडून काहीच उत्तर आलं नव्हतं. राहुल गांधी यांच्या कायदेशीर सल्लागारांनी शनिवारी निवडणूक आयोगासमोर या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला त्यामुळे यावर शंका उपस्थित करून भाजपानेही राहुल गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र आज झालेल्या दोन तासांच्या सुनावणीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019