शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे धक्के, देशातील अनेक शहरांमधील जमीन हादरली; चार देशांमध्ये भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:35 IST

Earthquake : भारतातील अनेक राज्यांमध्ये रात्री उशिरा २.३६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. कालच आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

मध्यरात्री  भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी उशिरा बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये  भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू नेपाळमधील सिंधुपालचौक असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे पहाटे २.३६ वाजता ६.१ तीव्रतेने पृथ्वी हादरली, हे धक्के अनेक राज्यांमध्ये जाणवले.

बिबट्याचा वावर, सर्च ऑपरेशनवेळी जिवाची भीती आणि 'हाच तो दत्ता गाडे'...; स्वारगेटचा नराधम असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

मिळेलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर, बिहारमधील पाटणा, सिलीगुडी, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग आणि सिक्कीममध्ये इमारती आणि छतावरील पंखे हादरताना दिसले. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भारतातील भूकंपाच्या तीव्रतेची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

रात्री भारतासह अन्य देशातही भूकंपाचे धक्के जाणवले. तीन तासांत भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानच्या पाकिस्तानातही पहाटे ५.१४ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी होती. यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू रावळपिंडीपासून आठ किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होता.

गेल्या काही दिवसांत भारताच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी देखील आसाममध्ये पहाटे २.३० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यापूर्वी १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली एनसीआर तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. 

टॅग्स :Earthquakeभूकंप