शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे धक्के, देशातील अनेक शहरांमधील जमीन हादरली; चार देशांमध्ये भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:35 IST

Earthquake : भारतातील अनेक राज्यांमध्ये रात्री उशिरा २.३६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. कालच आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

मध्यरात्री  भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी उशिरा बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये  भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू नेपाळमधील सिंधुपालचौक असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे पहाटे २.३६ वाजता ६.१ तीव्रतेने पृथ्वी हादरली, हे धक्के अनेक राज्यांमध्ये जाणवले.

बिबट्याचा वावर, सर्च ऑपरेशनवेळी जिवाची भीती आणि 'हाच तो दत्ता गाडे'...; स्वारगेटचा नराधम असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

मिळेलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर, बिहारमधील पाटणा, सिलीगुडी, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग आणि सिक्कीममध्ये इमारती आणि छतावरील पंखे हादरताना दिसले. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भारतातील भूकंपाच्या तीव्रतेची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

रात्री भारतासह अन्य देशातही भूकंपाचे धक्के जाणवले. तीन तासांत भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानच्या पाकिस्तानातही पहाटे ५.१४ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी होती. यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू रावळपिंडीपासून आठ किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होता.

गेल्या काही दिवसांत भारताच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी देखील आसाममध्ये पहाटे २.३० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यापूर्वी १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली एनसीआर तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. 

टॅग्स :Earthquakeभूकंप