शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या यशाचे गमक आधीच्या संघकार्यात

By admin | Updated: July 13, 2017 04:45 IST

देशाचे पंतप्रधान म्हणून जगाला दिसणारा उज्ज्वल प्रवास त्यांनी पूर्वी संघ स्वयंसेवक म्हणून केलेल्या ‘अप्रसिद्ध’ कामांमुळेच शक्य झाला आ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचा आधी गुजरातचे मुख्यमंत्री व आता देशाचे पंतप्रधान म्हणून जगाला दिसणारा उज्ज्वल प्रवास त्यांनी पूर्वी संघ स्वयंसेवक म्हणून केलेल्या ‘अप्रसिद्ध’ कामांमुळेच शक्य झाला आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी येथे सांगितले.‘सुलभ इंटरनॅशनल’चे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी मोदींवर लिहिलेल्या ‘‘मेकिंग आॅफ ए लेजंड’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर भागवत म्हणाले की, मोदी संघाचे स्वयंसेवक म्हणूनच काम करत राहिले असते तर संघ परिवाराबाहेरच्या फार थोड्यांनाच त्यांची खरी ओळख होऊ शकली असती. पण संघाने मात्र तरीही त्यांचे महत्त्व ओळखलेच असते.गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी मोदी एक संघ स्वयंसेवक म्हणून जसे होते तसेच आजही आहेत आणि जगभर मिळत असलेल्या प्रसिद्धी व प्रशंसेने त्यांच्या व्यक्तिमत्वात व नेतृत्वगुणांत काहीही फरक पडलेला नाही, असे सांगून ते म्हणाले की, मोदींमध्ये कष्ट करण्याची तयारी, धाडस, संयम, बुद्धिमत्ता, कणखरपणा आणि निर्धार असे अनेक गुण आहेत. काहीही करणे अशक्य आहे असे मानत नाहीत व ते शक्य करण्यासाठी आवश्यक तो खंबीरपणा दाखवतात.भागवत म्हणाले की, लोकांचे लक्ष मोदींच्या व्यक्तिमत्वावर केंद्रित होणे स्वाभाविक आहे. त्यांंच्यासारख्या यशस्वी व्यक्तीने त्यासाठी केलेल्या परिश्रमाचीही लोकांनी नोंद घ्यायला हवी. यादृष्टीने हे पुस्तक उपयुक्त आहे. त्यातून मोदी जसे भासतात, तसेच वास्तवातही आहेत, हे जगाला समजेल. स्वातंत्र्यानंतर आजवर काय करायला हवे याविषयीच बोलले गेले. पण आता त्या गोष्टी प्रत्यक्षात होऊ लागल्या आहेत. कारण आता प्रत्यक्ष काम केले जात आहे. दोन हजार वर्षांपूर्वी जगात भारताला जी प्रतिष्ठा होती ती पुन्हा प्राप्त करून त्याहूनही पुढे जाण्याचे काम करावे लागणार आहे. हे काम खूप मोठे आहे व एकटे सरकार त्यासाठी पुरे पडणार नसल्याने प्रत्येक नागरिकाने त्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जगभर निषेध होत असताना भागवत त्यावर काय बोलतात, याचे औत्सुक्य होते. पण त्यांनी भाषणात त्याचा उल्लेखही केला नाही.भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी प्रामुख्याने मोदी सरकारने हाती घेतलेल्या विविध विकास योजनांचा उल्लेख केला व या सर्वांचा परिणाम म्हणून सन २०२४पर्यंत भारताचे चित्र आमूलाग्र बदललेले असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.>मोदी उत्तम ठेकेदार!सरसंघचालक म्हणाले की, लोकांना आपल्या कल्याणासाठी मोदींच्या रूपाने कर्तबगार ठेकेदार मिळाला आहे. पण सर्व त्यांच्यावर सोपवून लोक स्वत: झोपून राहतील, असा धोका आहे. तसे होता कामा नये. लोकांनी मोदींवरील पुस्तके वाचून त्यांचे गुण अंगी बाणवायला हवेत.धर्माच्या नेतृत्वानेच कल्याणवृंदावन येथील एका संतपुरषाशी झालेल्या चर्चेचा हवाला देऊन भागवत म्हणाले की, जेव्हा धर्म नेतृत्व करेल, तेव्हाच देशाचे कल्याण होईल. धर्म याचा अर्थ सत्य, करुणा व आंतर्बाह्य शुचिता. हे साध्य करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. समाजात करुणा नसेल तर अनर्थ होईल.