शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

ई-रिक्षामुळे कोट्यवधी लोकांचे भविष्य बदलेल

By admin | Updated: March 14, 2015 01:53 IST

तसेच न्यायालयाच्या बंदीमुळे उपजीविकेच्या समस्येने त्रस्त ई-रिक्षा चालकांचे जीवनही पूर्वपदावर येईल, अशी ग्वाही केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेले मोटार वाहन दुरुस्ती विधेयक ऐतिहासिक असून, यामुळे लाखो गरीब बेरोजगारांना रोजगार मिळेल. तसेच न्यायालयाच्या बंदीमुळे उपजीविकेच्या समस्येने त्रस्त ई-रिक्षा चालकांचे जीवनही पूर्वपदावर येईल, अशी ग्वाही केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली. यावर्षी ७ जानेवारीला मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीसाठी राष्ट्रपतींनी वटहुकूम काढला होता. त्याचे रुपांतर कायद्यात करणाऱ्या विधेयकाला ३ मार्चला लोकसभेत आणि ११ मार्चला राज्यसभेत मंजुरी देण्यात आली. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गडकरी यांनी सांगितले की, मोटर वाहन कायद्यातील दुरुस्तीमुळे गरीबांचे जीवनमान उंचावण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही वेग येणार आहे. कारण ई-रिक्षाची निर्मिती आता भारतातच होऊ लागली आहे. यापूर्वी ते चीनमधून आयात करावे लागत होते. मनुष्याला मनुष्याचे ओझे वाहून उपजीविका करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, देशात सुमारे एक कोटीवर लोक सायकल रिक्षा चालवितात. ही अमानवीय प्रथा बंद झाली पाहिजे. कमी वयात सायकल रिक्षा चालविणे सुरू केल्यास क्षयरोग आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तसेच संबंधित व्यक्तीचे आयुर्मानही कमी होते, हे एक सत्य आहे. ई-रिक्षाला हिरवा झेंडा दाखविण्याचा संसदेचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारक आहे. टोल प्लाझावर थांब्यामुळे ८८ हजार कोटींचे नुकसान१ मार्चपासून आम्ही ई-टोल सुरू केला आहे. मुंबई ते दिल्ली मार्गावर जाणारे ट्रक आणि अन्य वाहनांना १८ टोलवर थांबावे लागते. प्रत्येक टोलवर १० मिनिटे गृहित धरता १८० मिनिटांचा वेळ जातो. टोलवर थांबावे लागत असल्यामुळे ७ हजार कोटी रुपयांच्या पेट्रोल- डिझेलचे नुकसान होते. एकूण नुकसान ८८ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे आयआयएम कोलकाता आणि ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन आॅफ इंडियाने आपल्या अहवालात म्हटले होते. मी ७५ टोल रद्द केले आहेत. छोट्या टोलनाक्यांना संपुष्टात आणले. आणखी ६० टोल रद्द करण्याचा विचार आहे. ३५० टोलपैकी २०० टोल ई-टोलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. टोल रूपांतरणासाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याची माहिती आमच्या विभागाने दिली आहे, असे गडकरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)