शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

राजकारणातील घराणेशाही देशापुढील आव्हान, मूळापासून उच्चाटन होणं आवश्यक : पंतप्रधान मोदी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 12, 2021 12:25 IST

अजून अनेक बदल शिल्लक, ते तरूण वर्गालाच पूर्ण करायचे आहेत; मोदींचं आवाहन

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला केलं संबोधितआडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चाललेत, मोदींचं वक्तव्य

"आज राजकारणात प्रामाणिक लोकांना संधी मिळत आहे. प्रामाणिकपणा आणि कामगिरी ही आजच्या राजकारणाची पहिली अनिवार्य अट असणार आहे. भ्रष्टाचार ज्यांचा वारसा होता तोच भ्रष्टाचार आज त्यांच्यावरील ओझं बनला आहे. अनेक प्रयत्न करूनही ते यातून बाहेर आलेले नाहीत. काही बदल अजूनही बाकी आहेत आणि देशातील तरूण वर्गालाच करायचे आहेत. राजकीय घराणेशाही देशासमोरी एक आव्हान आहे. त्याचं मूळासकट उच्चाटन होणं आवश्यक आहे. आता केवळ आडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चालले आहेत. परंतु घराणेशाही मूळापासून संपली नाही," असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते."स्वामी विवेकानंद म्हणत असतं जुन्या धर्मानुसार जो देवावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आहे. परंतु नवा धर्म सांगतो की जो स्वत:वर विश्वास ठेवत नाहीत ते नास्तिक आहेत. यापूर्वी देशात कोणती व्यक्ती राजकारणाकडे वळली तो बिघडत चालला आहे अशी धारणा होती. राजकारणाचा अर्थच तसा बनला होता. भांडण, लुटमार, भ्रष्टाचार या गोष्टी होत्या. लोकं म्हणत होती की सर्वकाही बदलू शकतं परंतु राजकारण नाही," असंही मोदी यावेळी म्हणाले. न घाबरणारे, स्वच्छ हृदयाचे, साहसी आणि महत्वाकांक्षी तरूणच राष्ट्राच्या भविष्याचा पाया आहेत असं स्वामी विवेकानंद म्हणत होते. ते तरूणांवर त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवत होते. देशाला प्रगतीपथावर नेण्याची संधी आपल्याला गमवायची नाहीये. पुढील २५-३० वर्षांचा कालावधी हा खुप महत्त्वाचा आहे. तरूण वर्गाला हे शतक भारताचं बनवावं लागेल. प्रत्येक आपल्या निर्णयात देशहित पाहिलं पाहिजे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तरूणांनी पुढे आलं पाहिजे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  "आजही असे काही लोकं आहेत ज्यांचे आचारविचार, ध्येय हे आपल्या कुटुंबाला राजकारणात वाचवण्याचं आहे. राजकीय घराणेशाही बी लोकशाही मध्ये हुकुमशाहीसह अकार्यक्षमतेलाही प्रोस्ताहन देते. राजकीय घराणेशाही, राष्ट्र प्रथम या ऐवजी केवळ माझं कुटुंब हिच भावना निर्माण करते. हेच देशातील राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचं कारण आहे," असंही मोदींनी नमूद केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद