शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

राजकारणातील घराणेशाही देशापुढील आव्हान, मूळापासून उच्चाटन होणं आवश्यक : पंतप्रधान मोदी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 12, 2021 12:25 IST

अजून अनेक बदल शिल्लक, ते तरूण वर्गालाच पूर्ण करायचे आहेत; मोदींचं आवाहन

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला केलं संबोधितआडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चाललेत, मोदींचं वक्तव्य

"आज राजकारणात प्रामाणिक लोकांना संधी मिळत आहे. प्रामाणिकपणा आणि कामगिरी ही आजच्या राजकारणाची पहिली अनिवार्य अट असणार आहे. भ्रष्टाचार ज्यांचा वारसा होता तोच भ्रष्टाचार आज त्यांच्यावरील ओझं बनला आहे. अनेक प्रयत्न करूनही ते यातून बाहेर आलेले नाहीत. काही बदल अजूनही बाकी आहेत आणि देशातील तरूण वर्गालाच करायचे आहेत. राजकीय घराणेशाही देशासमोरी एक आव्हान आहे. त्याचं मूळासकट उच्चाटन होणं आवश्यक आहे. आता केवळ आडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चालले आहेत. परंतु घराणेशाही मूळापासून संपली नाही," असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते."स्वामी विवेकानंद म्हणत असतं जुन्या धर्मानुसार जो देवावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आहे. परंतु नवा धर्म सांगतो की जो स्वत:वर विश्वास ठेवत नाहीत ते नास्तिक आहेत. यापूर्वी देशात कोणती व्यक्ती राजकारणाकडे वळली तो बिघडत चालला आहे अशी धारणा होती. राजकारणाचा अर्थच तसा बनला होता. भांडण, लुटमार, भ्रष्टाचार या गोष्टी होत्या. लोकं म्हणत होती की सर्वकाही बदलू शकतं परंतु राजकारण नाही," असंही मोदी यावेळी म्हणाले. न घाबरणारे, स्वच्छ हृदयाचे, साहसी आणि महत्वाकांक्षी तरूणच राष्ट्राच्या भविष्याचा पाया आहेत असं स्वामी विवेकानंद म्हणत होते. ते तरूणांवर त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवत होते. देशाला प्रगतीपथावर नेण्याची संधी आपल्याला गमवायची नाहीये. पुढील २५-३० वर्षांचा कालावधी हा खुप महत्त्वाचा आहे. तरूण वर्गाला हे शतक भारताचं बनवावं लागेल. प्रत्येक आपल्या निर्णयात देशहित पाहिलं पाहिजे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तरूणांनी पुढे आलं पाहिजे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  "आजही असे काही लोकं आहेत ज्यांचे आचारविचार, ध्येय हे आपल्या कुटुंबाला राजकारणात वाचवण्याचं आहे. राजकीय घराणेशाही बी लोकशाही मध्ये हुकुमशाहीसह अकार्यक्षमतेलाही प्रोस्ताहन देते. राजकीय घराणेशाही, राष्ट्र प्रथम या ऐवजी केवळ माझं कुटुंब हिच भावना निर्माण करते. हेच देशातील राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचं कारण आहे," असंही मोदींनी नमूद केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद