शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

हुंडाबळीप्रकरणी कोर्टाबाहेर समेट?

By admin | Updated: March 15, 2015 23:04 IST

हुंडाविरोधी कायद्याचा महिलांकडून दुरुपयोग होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हुंड्यासाठीच्या छळाप्रकरणी खटल्याच्या

नवी दिल्ली : हुंडाविरोधी कायद्याचा महिलांकडून दुरुपयोग होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हुंड्यासाठीच्या छळाप्रकरणी खटल्याच्या प्रारंभी पती आणि पत्नीला प्रकरण सामोपचाराने मिटविण्याची परवानगी देणारी दुरुस्ती करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने रविवारी याबाबतचे संकेत दिले. हुंडाविरोधी कायद्याच्या भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८(अ) मध्ये दुरुस्ती करून न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयाबाहेर प्रकरण सामोपचाराने मिटविण्याची संधी देणारी तरतूद प्रस्तावित असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. विधि आयोग आणि न्या. मलिमथ समितीनेही या आशयाची शिफारस केली आहे. विद्यमान कायद्यानुसार, या गुन्ह्यात वाद सामोपचाराने मिटवण्याची कुठलीही शक्यता नाही. हा एक अजामीनपात्र गुन्हा असून, यात आरोपीच्या तात्काळ अटकेची तरतूद आहे. या अंतर्गत पीडितेचा पती तसेच त्याचे कुटुंबीय स्वत:ला न्यायालयात निर्दोष सिद्ध करीत नाही, तोपर्यंत त्यांना दोषी मानले जाते.हुंडाविरोधी कायद्याचा महिलांकडून गैरवापर होत असून, सासरच्या मंडळींवर दबाव टाकण्यासाठी याचा सर्रास वापर होत असल्याच्या तक्रारी अलीकडे वाढल्या आहेत. अशा स्थितीत न्यायालयाबाहेर वाद मिटविण्याची संधी मिळाल्यास, कायद्याचा दुरुपयोग थांबवण्यास मदत मिळेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सामोपचाराने प्रकरण मिटविण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल. त्यामुळे पीडितेवर पती वा सासरची मंडळी वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी दबाव टाकू शकणार नाहीत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.दुरुस्तीअंतर्गत दंडाची रक्कम वाढविण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. हुंड्यासाठी विवाहितेचा छळ होत असल्याचे वा विवाहितेकडून संबंधित कायद्याचा दुरुपयोग झाल्याचे सिद्ध झाल्यास, तूर्तास केवळ १००० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. दुरुस्तीनंतर दंडाची रक्कम १५ हजार करण्याची तरतूद प्रस्तावित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)