शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आदिवासी समाजामुळेच खूप शिकले : डॉ. स्मिता कोल्हे

By admin | Updated: May 5, 2015 01:22 IST

(फोटो आहे..)

(फोटो आहे..)
पणजी : मेळघाटातील मोहर फुलविताना समाजातील माणुसकीला सहन करावे लागणारे मुके अश्रू मी अनुभवले आहेत. स्वत:च्या भाकरीतली अर्धी भाकरी देणारी बैलपार आदिवासी जमातींचे संस्कार व संस्कृती मी शिकले. त्यांना शिकविण्यास जाणारी आम्ही शहरी सुशिक्षित मंडळी हा माज उतरला व मीच त्यांच्याकडून ३0 वर्षांत आयुष्याचे गूढ शिकून घेतले, असे गहिवरलेल्या मनस्थितीत डॉ. स्मिता कोल्हे यांनी सांगितले.
अनाम प्रेम संस्था आणि कला अकादमी यांच्या सहकार्याने मेळघाटातील बैलपार या गावात आदिवासी जमातीसाठी कार्य करणार्‍या डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे यांच्याशी संवाद हा कार्यक्रम कला अकादमीत आयोजिला होता. डॉ. स्मिता यांनी या वेळी पूर्वायुष्य आणि ३0 वर्षांचा मेळघाटातील प्रवास याबाबत प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधला.
लग्नापूर्वीचे आयुष्य व मेळघाटाचा प्रवास
डॉ. स्मिता म्हणाल्या, माझे माहेर नागपूर जिल्‘ात. पूर्वीची स्मिता मांजरे. बीएपर्यंत कला, संगीत व नंतर पुन्हा कायदा आणि वैद्यकीय शिक्षण घेउन डॉक्टर झाले. सधन घराण्यातील व सुखवस्तू जीवन उपभोगणारी अशी मुलगी. केवळ ५ रुपयांत लग्न केले. मासिक ४00 रुपये मोडून संसार आणि ४0 किलोमीटर चालणे असा प्रवास या अटीवर डॉ. रवी कोल्हे यांच्याशी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर जंगलमय भागात मेळघाटातील बैलपार या गावी संसार सुरू केला. बैलपार येथे दार नसलेले आणि हलक्याशा वार्‍यानेही छप्पर उडावे असे झोपडे. पावसाळ्यात घरातच पूर यायचा अशा परिस्थितीत संसार चालविला, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
तेथील महिलांना अनेक समस्यांशी झुंजावे लागते याचा अंदाज कालांतराने येऊ लागला व महिलांसाठी लढाईत उतरावेच लागेल म्हणून कायद्याचा हात धरून त्यात झोकून दिले. आदिवासी महिलांचे दुसर्‍या समाजातील पुरुषांकडून होणारे शोषण थांबविणे ही महत्त्वाची लढाई होती. तेथील पोलीसही ज्या समाजाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत, घाबरत असत अशांशी लढा देऊन तिथल्या बायकांना कायद्याचे ताविज दिले. आज महिला स्वत:वर होणार्‍या अन्यायाविरोधात स्वत:च लढतात, असे कोल्हे म्हणाल्या.
(जोड बातमी...