शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 12:34 IST

 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांचा दारुण पराभव झाला.

रांची/पाटणा -  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. अनेक राज्यात स्थानिक पक्षांचा दारुण पराभव झाला. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांची दाणादाण उडाली. एकेकाळी बिहारच्या राजकारणावर एकछत्री वर्चस्व गाजवणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. दरम्यान, लोकसभेच्या निकालात आरजेडीच्या झालेल्या दारुण पराभवामुळे पक्षप्रमुख लालूप्रसाद यादव यांना धक्का बसला आहे. निकालांनंतर लालूप्रसाद यादव यांनी जेवण कमी केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यावर सध्या रांची येथील आरआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसांपासून लालू यादव हे सकाळी कसाबसा नाश्ता करतात. मात्र दुपारचे भोजन न करता थेट रात्री जेवण घेतात. त्यामुळे जेवण कमी केल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. ''आम्ही आपल्यपरीने त्यांची खूप समजूत घातल आहोत. अशाप्रकारे जेवण सोडणे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले नाही. जर त्यांनी वेळेत भोजन केले नाही तर त्यांना ओषध आणि इंशुलिन देण्यात अडचणी येतील. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टर म्हणाले. तसेच निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यामुळे लालूंची अशी स्थिती झाली आहे का, असे विचारले असता डॉक्टरांनी आम्ही याबाबत त्यांना काहीही विचारलेले नाही. मात्र तुम्ही निष्कर्ष काढू शकता, असेही सांगितले.    मात्र राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी ही बाब फेटाळून लावली आहे. लालूजींसाठी ही काही पहिली निवडणूक नाही, असे सांगत पराभावमुळे लालूप्रसाद यादव तणावात असल्याचे वृत्त फेटाळले. तर लालूप्रसाद यादव यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात कडवे आव्हान उभे करण्याचे आदेश दिले आहेत, असे अन्य एका आमदाराने सांगितले.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपाने एकतर्फी विजय मिळवताना 40 पैकी 39 जागांवर कब्जा केला. लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीला एकही जागा मिळाली नाही. तर काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीसाठी आरजेडीने काँग्रेस, आरएलएसपी, हम आणि व्हीआयपी या पक्षांसोबत महाआघाडी केली होती.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019