शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बहुतांश वीज पुरवठा सुरळीत राखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 18:40 IST

मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी कोणत्याही व्यत्ययाविना अखंड वीज पुरवठा करण्यात आला.

मुंबई : महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात झालेल्या मोठ्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संपूर्ण रात्र अथक मेहनत घेऊन विजेचा ताळमेळ राखण्यात यश मिळवले. त्यामुळे भांडुप नागरी परिमंडलाअंतर्गत येणाऱ्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी कोणत्याही व्यत्ययाविना अखंड वीज पुरवठा करण्यात आला. कळवा येथील उपकेंद्राच्या आगीमुळे अद्यापही परिस्थिती पूर्ववत होण्यास काही कालावधी लागणार आहे. यादरम्यान ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात तुरळक प्रमाणात व्यत्यय येऊ शकतो. अशा काळात महावितरणने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे उपकेंद्रातील यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांचा वीज पुरवठा प्रभावित झाला होता. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महापारेषणच्या २२० केव्ही खारघर बोरीवली वाहिनी ही २२० केव्ही महापे वाहिनीस जोडण्यात आली आहे. तसेच महावितरणकडून वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा आटोकाट प्रयत्नामुळे काही तुरळक भाग वगळता ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. मात्र, तरीही विजेची मागणी वाढल्यास यंत्रणेवर अधिकचा भार येऊन यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. अशा परीस्थितीत महावितरणने ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात कमीत कमी व्यत्यय येईल याकरता प्रभावी नियोजन केले आहे. या काळात ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे. 

टॅग्स :electricityवीज