शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे संताप

By admin | Updated: March 18, 2016 04:15 IST

पेट्रोलच्या दरात नोव्हेंबरपासून ४. 0२ रुपये आणि डिझेलच्या दरात ६.९७ रुपये वाढ झाल्याने देशभरात संताप आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताच भाजपचे

नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात नोव्हेंबरपासून ४. 0२ रुपये आणि डिझेलच्या दरात ६.९७ रुपये वाढ झाल्याने देशभरात संताप आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताच भाजपचे नेते जोरदार टीका सुरू करीत. डॉ. मनमोहन सिंग सरकारवर दरवाढीचे खापर फोडत.आता मात्र दरवाढीवर भाजपा नेते मूग गिळून गप्प आहेत.केंद्रामध्ये यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती प्रति गॅलन १२0 डॉलर्सवर गेल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत होते. त्याबद्दल भाजपचे सर्वच नेते यूपीए सरकारला दोषी धरत होते. आजच्या घडीला जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव ४0 डॉलर्सच्या खाली आले आहेत. त्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचे दर खाली येणे अपेक्षित होते. पण तसे न होता सतत दरवाढ सुरू असून, त्यामुळे सामान्यांमध्ये संताप आहे.डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक लवकरच आणखी महाग होण्याची शक्यता आहे.सर्व राज्यांच्या परिवहन मंडळाच्या (स्टेट ट्रान्सपोर्ट-एसटी) बसेस डिझेलवर धावतात. खासगी बसेसही डिझेलवर चालतात. त्यामुळे सर्व देशभर प्रवासी भाडे उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात महागणारआहे. मालवाहतूक करणारे ट्रक, टेम्पो हेही डिझेलवरच चालत असून, मालवाहतूकदारही आपले दर वाढवण्याच्या तयारीत असून, महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाचा तोटा वाढतच चालला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)भाजप नेत्यांनी वेळोवेळी केलेले ट्विट पुढीलप्रमाणे...नरेंद्र मोदी : (२३ मे २0१२ रोजी दरवाढ झाली, तेव्हा) हे काँग्रेस आणि यूपीए सरकारचे अपयश असून, यामुळे गुजरातच्या जनतेवर आर्थिक बोजा पडणार आहे. स्मृती इराणी : (१५ जानेवारी २0११ रोजी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, तेव्हा) जनतेच्या संतापाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे.लोकांच्या भावनांचा अंत पाहत आहे.सुषमा स्वराज : ( ३ नोव्हेंबर २0११ रोजी पेट्रोल व डिझेलची भाववाढ झाल्यावर ) डॉ. मनमोहन सिंग सरकार सामान्यांच्या समस्यांविषयी असंवेदनशील आहे.स्मृती इराणी : (१६ नोव्हेेंबर २0११ रोजीच्या दरवाढीविषयी) केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे.आता नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी हे तिन्ही नेते केंद्रात सत्तेवर असूनही दरवाढ होणे ही जनतेची फसवणूक असल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे.