शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

आर्थिक सुखवस्तू झाल्याने मागासलेपण नष्ट होत नाही, केंद्राचा युक्तिवाद मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 04:50 IST

राष्ट्रपतींनी एकदा एखादा समाज मागास असल्याचे ठरवून त्याचा समावेश संबंधित अनुसूचित केल्यानंतर बढत्यांमधील आरक्षणाच्या वेळी त्या समाजाचे मागासलेपण पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही, हा केंद्र सरकारने केलेला युक्तिवाद उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केला.

नवी दिल्ली  -  राष्ट्रपतींनी एकदा एखादा समाज मागास असल्याचे ठरवून त्याचा समावेश संबंधित अनुसूचित केल्यानंतर बढत्यांमधील आरक्षणाच्या वेळी त्या समाजाचे मागासलेपण पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही, हा केंद्र सरकारने केलेला युक्तिवाद उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केला. मात्र, सरकारी सेवेत आला व आर्थिकदृष्ट्या थोडा सुखवस्तू झाला म्हणून मुळात अनुसूचित जाती किंवा जमातीच्या असलेल्या कर्मचाऱ्याचे मागासलेपण व पूर्वापार चालत आलेला अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा होत नाही.त्यामुळे या कर्मचाºयांना बढत्यांमध्ये आरक्षण देताना ‘क्रीमी लेयर’चे तत्त्व लागू केले जाऊ नये, हे सरकारचे म्हणणे न्यायालायने अमान्य केले. न्यायालयाने म्हटले की, मागास समाजातील तुलनेने सुखवस्तू व्यक्तींनीच आरक्षणाचे सर्व लाभ मिळवून त्यांच्याहून मागासांना वंचित राहावे लागू नये, यासाठी हे तत्त्व लावणे गरजेचे आहे.सरकारी सेवांमध्ये संबंधित समाजास पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले आहे की नाही, हे ठरविताना त्या समाजाचे एकूण लोकसंख्येमधील प्रमाण हा निकष असावा, असाही केंद्र सरकारचा आग्रह होता. मात्र, ते अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, जेथे असा निकष लावायचा तेथे राज्यघटनेत तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.दरम्यान, कास्ट्राईब कर्मचारी महासंघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या महासंघाच्या लढ्याला न्यायालयाच्या निर्णयामुळे यश मिळाले, असे इंगळे यांनी सांगितले.संसद व विधिमंडळातील राखीव जागा या त्याप्रमाणे ठरविल्या जातात. मात्र, नोकºयांमधील आरक्षणासही तोच निकष लावणे राज्यघटनेस अपेक्षित नाही. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता अबाधित ठेवून मागास समाजांना किती प्रतिनिधित्व द्यायचे हे सरकारने गुणवत्तेवर विचार करून ठरवायचे आहे.राज्यातील प्रकरणाचे काय?महाराष्ट्र सरकारने बढत्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी सन २००४ मध्ये केलेला कायदा उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्यानंतर आता ते प्रकरण अपिलात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.उच्च न्यायालयाने तो निकाल प्रामुख्याने नागराज निकालाच्या आधारे दिला होता. आता नागराज निकालातील एक महत्त्वाचा मुद्दा रद्द झाला असला तरी सन २००४ चा कायदा टिकविण्यासाठी राज्य सरकारला या ताज्या निकालाचा फारसा फायदा होईल, असे दिसत नाही. कारण हा निकाल पूर्वलक्षी नसल्याने आधी केलेल्या कायद्यांना तो लागू होणार नाही.आताच्या निकालाच्या आधारे नवा कायदा करून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करीत आरक्षणाने दिलेल्या बढत्या वाचविणे हा सरकारसाठी तुलनेने अधिक सोयीचा मार्ग आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण