शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची दाहकता वाढली १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर : हतनूरचा साठा १० टक्क्यांवर

By admin | Updated: May 12, 2016 22:53 IST

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.
मराठवाडा व विदर्भातील हजारो गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असताना शासनाने दुष्काळ जाहीर का केला नाही, अशी कानउघाडणी उच्च न्यायालयाने केल्यानंतर महसूल विभागाने २९ हजार ३०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करणारा आदेश काढला आहे.
जिल्‘ातील १२९५ गावांत दुष्काळ
शासनाने दुष्काळाची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यातील १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यापूर्वी या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृष्यस्थिती असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. दुष्काळ जाहीर केल्यानंतर या गावांमध्ये शासनातर्फे कृषि पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात आली होती. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय झाला होता. यासह कापूस, मका व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये १०५ कोटींची वाटप
जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात अंतिम आणेवारी जाहीर केली. त्यात तब्बल १२९५ गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आहे. राज्य शासनातर्फे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १०५ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप या गावांमधील शेतकर्‍यांना करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रशासनाने ९७ कोटी ७९ लाख ४७ हजार ७१२ रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना तहसीलदारांमार्फत वाटप केली होती. त्यानंतर उर्वरित रक्कमदेखील वाटप केली होती.

हतनूरचा साठा १०.५ टक्के
मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गिरणा धरणात पाणीसाठा शून्य आहे. तर हतनूर धरणात अवघा १०.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाघूर धरणात ५३.०९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १५.४७ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

६१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी
जिल्ह्यातील ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी महिला व नागरिकांना भटकंती करावी लागत असताना जिल्हा प्रशासनातर्फे ६१ गावांमध्ये ५७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १० शासकीय टँकर तर ४७ खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २२१ गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर ९६६ गावांमध्ये नवीन विंधनविहिर घेण्यात आल्या आहेत.