शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

दुष्काळाची दाहकता वाढली १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर : हतनूरचा साठा १० टक्क्यांवर

By admin | Updated: May 12, 2016 22:53 IST

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.
मराठवाडा व विदर्भातील हजारो गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असताना शासनाने दुष्काळ जाहीर का केला नाही, अशी कानउघाडणी उच्च न्यायालयाने केल्यानंतर महसूल विभागाने २९ हजार ३०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करणारा आदेश काढला आहे.
जिल्‘ातील १२९५ गावांत दुष्काळ
शासनाने दुष्काळाची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यातील १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यापूर्वी या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृष्यस्थिती असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. दुष्काळ जाहीर केल्यानंतर या गावांमध्ये शासनातर्फे कृषि पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात आली होती. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय झाला होता. यासह कापूस, मका व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये १०५ कोटींची वाटप
जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात अंतिम आणेवारी जाहीर केली. त्यात तब्बल १२९५ गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आहे. राज्य शासनातर्फे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १०५ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप या गावांमधील शेतकर्‍यांना करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रशासनाने ९७ कोटी ७९ लाख ४७ हजार ७१२ रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना तहसीलदारांमार्फत वाटप केली होती. त्यानंतर उर्वरित रक्कमदेखील वाटप केली होती.

हतनूरचा साठा १०.५ टक्के
मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गिरणा धरणात पाणीसाठा शून्य आहे. तर हतनूर धरणात अवघा १०.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाघूर धरणात ५३.०९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १५.४७ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

६१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी
जिल्ह्यातील ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी महिला व नागरिकांना भटकंती करावी लागत असताना जिल्हा प्रशासनातर्फे ६१ गावांमध्ये ५७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १० शासकीय टँकर तर ४७ खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २२१ गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर ९६६ गावांमध्ये नवीन विंधनविहिर घेण्यात आल्या आहेत.