शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची दाहकता वाढली १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर : हतनूरचा साठा १० टक्क्यांवर

By admin | Updated: May 12, 2016 22:53 IST

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.
मराठवाडा व विदर्भातील हजारो गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असताना शासनाने दुष्काळ जाहीर का केला नाही, अशी कानउघाडणी उच्च न्यायालयाने केल्यानंतर महसूल विभागाने २९ हजार ३०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करणारा आदेश काढला आहे.
जिल्‘ातील १२९५ गावांत दुष्काळ
शासनाने दुष्काळाची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यातील १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यापूर्वी या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृष्यस्थिती असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. दुष्काळ जाहीर केल्यानंतर या गावांमध्ये शासनातर्फे कृषि पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात आली होती. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय झाला होता. यासह कापूस, मका व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये १०५ कोटींची वाटप
जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात अंतिम आणेवारी जाहीर केली. त्यात तब्बल १२९५ गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आहे. राज्य शासनातर्फे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १०५ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप या गावांमधील शेतकर्‍यांना करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रशासनाने ९७ कोटी ७९ लाख ४७ हजार ७१२ रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना तहसीलदारांमार्फत वाटप केली होती. त्यानंतर उर्वरित रक्कमदेखील वाटप केली होती.

हतनूरचा साठा १०.५ टक्के
मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गिरणा धरणात पाणीसाठा शून्य आहे. तर हतनूर धरणात अवघा १०.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाघूर धरणात ५३.०९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १५.४७ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

६१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी
जिल्ह्यातील ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी महिला व नागरिकांना भटकंती करावी लागत असताना जिल्हा प्रशासनातर्फे ६१ गावांमध्ये ५७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १० शासकीय टँकर तर ४७ खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २२१ गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर ९६६ गावांमध्ये नवीन विंधनविहिर घेण्यात आल्या आहेत.