शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

दुष्काळाची दाहकता वाढली १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर : हतनूरचा साठा १० टक्क्यांवर

By admin | Updated: May 12, 2016 22:53 IST

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.

जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्‘ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्‘ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०.५ टक्क्यांवर आला आहे.
मराठवाडा व विदर्भातील हजारो गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असताना शासनाने दुष्काळ जाहीर का केला नाही, अशी कानउघाडणी उच्च न्यायालयाने केल्यानंतर महसूल विभागाने २९ हजार ३०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करणारा आदेश काढला आहे.
जिल्‘ातील १२९५ गावांत दुष्काळ
शासनाने दुष्काळाची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यातील १२९५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यापूर्वी या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृष्यस्थिती असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. दुष्काळ जाहीर केल्यानंतर या गावांमध्ये शासनातर्फे कृषि पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात आली होती. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय झाला होता. यासह कापूस, मका व सोयाबिन खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये १०५ कोटींची वाटप
जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात अंतिम आणेवारी जाहीर केली. त्यात तब्बल १२९५ गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आहे. राज्य शासनातर्फे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या १०५ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप या गावांमधील शेतकर्‍यांना करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रशासनाने ९७ कोटी ७९ लाख ४७ हजार ७१२ रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना तहसीलदारांमार्फत वाटप केली होती. त्यानंतर उर्वरित रक्कमदेखील वाटप केली होती.

हतनूरचा साठा १०.५ टक्के
मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. गिरणा धरणात पाणीसाठा शून्य आहे. तर हतनूर धरणात अवघा १०.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाघूर धरणात ५३.०९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ १५.४७ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

६१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी
जिल्ह्यातील ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी महिला व नागरिकांना भटकंती करावी लागत असताना जिल्हा प्रशासनातर्फे ६१ गावांमध्ये ५७ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात १० शासकीय टँकर तर ४७ खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २२१ गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर ९६६ गावांमध्ये नवीन विंधनविहिर घेण्यात आल्या आहेत.