शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

दुष्काळ; जागतिक बँक-फडणवीस

By admin | Updated: April 26, 2016 01:59 IST

दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडेमुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादरमुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ...


दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडे
मुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादर
मुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडून ५ हजार कोटींचे कर्ज मागितले असून तसा प्रस्तावही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्यातील ३ हजार गावे आणि विदर्भातील २ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यास मोठी मदत होईल. तसेच जलसंवर्धनाच्या कामावरही भर देता येईल. त्यानंतर दुष्काळी भागासाठी पीकपद्धत बदलण्याचा निर्णय घेतला जाईल. ही योजना मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात राबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जलसंवर्धन ते पीक पद्धतीत बदल करणे, यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून दुष्काळाचे निवारण करण्यासाठी जागतिक बँकेने दुष्काळ निवारण निधीतून ५ हजार कोटींचे कर्ज देऊन मदत करावी, अशी जागतिक बँकेला विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ही मदत मागण्यात आल्याचे त्यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
जागतिक बँकेच्या दुष्काळ निवारण निधीतून हे कर्ज मिळण्यास साधरणत: दीड वर्षे लागते. परंतु, महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर आमच्या प्रस्तावाचा विचार करावा, अशी विनंती जागतिक बँकेच्या अधिकार्‍यांना केली आहे.