शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

महाराष्ट्रातील दुष्काळ राज्यसभेत

By admin | Updated: November 28, 2014 00:07 IST

शिवसेनेचे ज्येष्ठ खा. राजकुमार धूत यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला.

नवी दिल्ली : शिवसेनेचे ज्येष्ठ खा. राजकुमार धूत यांनी गुरुवारी राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न उपस्थित केला. मराठवाडय़ासह विदर्भातील टंचाईग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. या भागांत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा यांची तीव्र टंचाई आहे. दुष्काळी भागात शेतक:यांच्या हाती पीकही फारसे लागणार नाही याकडे खा. धूत यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 
शून्य प्रहरात हा विषय धूत यांनी उपस्थित केला. धूत यांनी सांगितले की, राज्यातील 39134 खेडय़ांपैकी 1969 खेडय़ांमध्ये तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. औरंगाबाद विभागातील 8 हजार, अमरावती विभागातील 7241 आणि नागपूर विभागातील 2क्29 व उर्वरित अन्य विभागातील खेडय़ांचा त्यात समावेश आहे.
 दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागांतील शेतक:यांच्या हाती पीकही नगण्य असेल म्हणून हे भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हायला हवे होते परंतु तसे झालेले नाही. या भागांना तातडीने मोठय़ा प्रमाणावर मदत हवी असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर संसाधनांची गरज असल्याचे धूत म्हणाले. 
दुष्काळग्रस्त भागांना तातडीने दिलासा मिळण्यासाठी केंद्राकडून प्राधान्याने निधी मिळणो ही काळाची गरज आहे, असे सांगून धूत यांनी यासंदर्भात मी कृषीमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असे सांगितले.
या गंभीर विषयात तातडीने वैयक्तिक लक्ष घालून या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त ग्रामीण लोकांना व मुक्या जनावरांना मदत म्हणून महाराष्ट्राला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन राजकुमार धूत यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी केले.