शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महाराष्ट्रात 22 जिल्ह्यांत दुष्काळीस्थिती

By admin | Updated: November 26, 2014 01:42 IST

महाराष्ट्रात 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याचे केंद्राने मान्य केले

नवी दिल्ली : महाराष्ट्रात 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याचे केंद्राने मान्य केले असून, महत्त्वपूर्ण उपाययोजनांसह राष्ट्रीय सहायता कोषातून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी लोकसभेत सांगितले. 
तात्पुरत्या योजनांसाठी 9क्क् कोटींचे नियोजन करण्यात येत असून, महाराष्ट्रासोबत हरियाणा, उत्तरप्रदेश, कर्नाटक या राज्यातील जिल्ह्यांनाही त्यातूनच निधी विभागून दिला जाणार आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकासयोजनेसह इतर योजनांमधून 1क् टक्के रक्कम दुष्काळी उपायांसाठी राखून ठेवण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या सूचनेनंतर चार महत्त्वाच्या उपाययोजना सरकारला करण्याचे सांगण्यात आले आहे, असे त्यांनी खा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर दिले. राज्य सरकार दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम असून, केंद्र त्यांना मदत करणार आहे. सरकारकडून दुष्काळाचा सामना करण्यास आर्थिक मदतीची मागणी आल्याबरोबर वर्तमान मापदंडानुसार राज्य आपत्ती निवारण कोषाव्यतिरिक्त राष्ट्रीय सहायता कोषातून मदत दिली जाईल.  
दुष्काळामुळे एकाही शेतक:यांने आत्महत्या केलेली नाही, असे स्पष्ट करून त्यांनी पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी डीजल सहायता योजा, दुबार पेरणीची वेळ आल्यास आर्थिक मदत देणार असून, यामध्ये , बारमाही बागायत पिकांचाही समावेश असेल. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अतिक्ति चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
 
मुंबई-गोवा मार्गाचे काम सुरू
केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी राज्यसभेत सांगितले की, गोवा- मुंबई महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या मार्गावरील 84 किलोमीटरचे चौपदरी रस्त्याचे काम सुरू झाले असून, प्रकल्पासाठी 4121 कोटींच्या अभ्यास अहवाल लवकरच येईल.