शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर मुद्द्यावरुन गदारोळ सुरूच, INDIA चे खासदार काळे कपडे परिधान करून पोहोचले संसदेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:54 IST

विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुनसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला.

गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक झाली. ज्यामध्ये सभागृहाच्या कामकाजाच्या रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीत १७ पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक चर्चेवर ठाम असून त्यासाठीच अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, डीएमके, सीपीआय(एम), आरजेडी, एसपी, एनसीपी, एसएस, आप, सीपीआय, आययूएमएल, आरएलडी, केसी(एम), जेएमएम, जेडी (यू), आरएसपी, व्हीसीके या पक्षांचा समावेश होता.

विरोधकांचा केंद्र सरकारवर निशाणाशिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "आम्ही काळे कपडे घालून निषेध करण्यासाठी आलो आहोत. आज संसदीय लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान आपले मौन सोडत नाहीत", असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. तर लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या गौरव गोगोई यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पंतप्रधान मणिपूरच्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, देशाचा भाग जळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि पंतप्रधान केवळ भाषणात व्यस्त आहेत.

अविश्वास प्रस्तावावर लवकरच होणार चर्चा दरम्यान, बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला मंजुरी देण्यात आली आहे. सभापती ओम बिर्ला यांनी गौरव गोगोई यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा केव्हा आणि किती काळ होणार याबाबत लवकरच चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सतत चर्चा करण्यास सांगितले. अमित शाह म्हणाले की, "प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी स्वतः देईल". मात्र, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर दिले पाहिजे, या भूमिकेवर विरोधक ठाम होते. यामुळेच मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.  

टॅग्स :ParliamentसंसदManipur Violenceमणिपूर हिंसाचार