शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मणिपूर मुद्द्यावरुन गदारोळ सुरूच, INDIA चे खासदार काळे कपडे परिधान करून पोहोचले संसदेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:54 IST

विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुनसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारविरोधात विरोधकांचा हल्लाबोल सुरूच आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष मणिपूरच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे खासदार आज काळे कपडे परिधान करून सभागृहात पोहोचले आणि केंद्र सरकारचा निषेध केला.

गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांची बैठक झाली. ज्यामध्ये सभागृहाच्या कामकाजाच्या रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीत १७ पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. दरम्यान, मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक चर्चेवर ठाम असून त्यासाठीच अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, डीएमके, सीपीआय(एम), आरजेडी, एसपी, एनसीपी, एसएस, आप, सीपीआय, आययूएमएल, आरएलडी, केसी(एम), जेएमएम, जेडी (यू), आरएसपी, व्हीसीके या पक्षांचा समावेश होता.

विरोधकांचा केंद्र सरकारवर निशाणाशिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "आम्ही काळे कपडे घालून निषेध करण्यासाठी आलो आहोत. आज संसदीय लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान आपले मौन सोडत नाहीत", असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. तर लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या गौरव गोगोई यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पंतप्रधान मणिपूरच्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, देशाचा भाग जळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि पंतप्रधान केवळ भाषणात व्यस्त आहेत.

अविश्वास प्रस्तावावर लवकरच होणार चर्चा दरम्यान, बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला मंजुरी देण्यात आली आहे. सभापती ओम बिर्ला यांनी गौरव गोगोई यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा केव्हा आणि किती काळ होणार याबाबत लवकरच चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सतत चर्चा करण्यास सांगितले. अमित शाह म्हणाले की, "प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी स्वतः देईल". मात्र, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर दिले पाहिजे, या भूमिकेवर विरोधक ठाम होते. यामुळेच मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.  

टॅग्स :ParliamentसंसदManipur Violenceमणिपूर हिंसाचार