शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

राज्यगीतातून एक वाक्य वगळल्याने भडकले मुख्यमंत्री; राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 09:04 IST

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केली आहे.

Tamil Nadu Anthem :तामिळनाडूमध्ये हिंदी महिन्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात गायकांनी तामिळनाडूचे राज्यगीत गायले. पण गाण्यातून एक शब्द गायब होता. त्यावरून तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय गदारोळ सुरू झालाय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यपालांवर टीका केली. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, राज्यपाल आरएन रवी यांनी हे आरोप दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. देशाच्या आत आणि बाहेर अशा शक्ती आहेत ज्यांना विकासात अडथळे आणायचे आहेत, असं राज्यपालांनी म्हटलं.

चेन्नईमध्ये दूरदर्शनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी हिंदी महिन्याच्या समारोपाच्या वेळी गायलेल्या 'तमिळ थाई वाझ्थु' या राज्यगीतामधून द्रविडियन शब्द काढून टाकल्याबद्दल राज्यपाल आर.एन. रवीवर निशाणा साधला. दूरदर्शनच्या चेन्नई कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासह राज्यपाल आर.एन. रवी सहभागी झाले होते. या वादानंतर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केली आहे.

मात्र, राजभवनाने स्टॅलिन यांनी केलेल आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यपाल आर.एन. रवी फक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ज्यांनी हे गाणे गायले त्यांच्याकडून अनवधानाने हा शब्द राहून गेला. राज्यगीत गाणाऱ्या गायकांनी चुकून 'थेक्कामुम अधीरसिरंधा द्रविड नल थिरुनाडुम' ही ओळ वगळली होती, जी द्रविड भूमीतील एका महिलेचा संदर्भ देते. ही ओळ वगळल्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राष्ट्रगीतामधून द्रविड हा शब्द काढून टाकण्याचे धाडस राज्यपाल करतील का, असा सवाल केला. स्टॅलिन यांनी हा तामिळनाडू आणि तमिळ भाषेचा अपमान असल्याचे म्हटले आणि राज्यपाल रवी यांना द्रविडांची ॲलर्जी असल्याचे सांगून  केंद्राकडे त्यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली.

"राज्यगीतामधून द्रविड शब्द काढून टाकणे तामिळनाडूच्या कायद्याविरुद्ध आहे. कायद्याचे पालन न करणारी व्यक्ती पदावर राहण्यास पात्र नाही. भारताचा उत्सव साजरा करण्याच्या नावाखाली राज्यपाल देशाच्या एकात्मतेचा आणि विविध जातींच्या लोकांचा अपमान करत आहेत. राष्ट्रगीतातूनही द्रविड शब्द टाकण्यास राज्यपाल सांगतील का? केंद्र सरकारने तात्काळ राज्यपालांना बोलावले पाहिजे कारण ते जाणूनबुजून तामिळनाडू आणि तेथील जनतेच्या भावनांचा अपमान करत आहेत," असं मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल रवी यांनी या प्रकरणावर स्टॅलिन यांनी आपल्या विरोधात अवास्तव विधाने केली असून त्यांना जातिवादी म्हटले आहे. प्रत्येक कार्यक्रमात ते तमिळ थाई वाझ्थू पूर्ण आदराने गातात, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांचे माध्यम सल्लागार थिरुग्नाना संबंदम यांनी एका निवेदनात म्हटले की, गायकांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला द्रविडीयन शब्द असलेली ओळ अनवधानाने वगळली होती. त्यांनी या प्रकरणाची माहिती आयोजकांना देऊन अधिकाऱ्यांनी याकडे योग्य लक्ष देण्याची विनंती केली.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू