शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतिपदासाठी डॉ. विजय भटकर?

By admin | Updated: June 18, 2017 03:49 IST

राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला असून, सोमवारी होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत याचा निर्णायक

- हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला असून, सोमवारी होणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत याचा निर्णायक टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत उमेदवार ठरविण्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जातील, असे दिसते. राष्ट्रपतिपदासाठी ख्यातनाम संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे नाव पुढे आले आहे.अण्णाद्रमुकचे दोन्ही गट, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेससह आघाडीतील इतर काही छोटे पक्ष त्यांच्या पाठिंब्याची औपचारिक पत्रे मंगळवारपर्यंत पंतप्रधानांकडे पाठवतील, असे समजते. परंतु आपण निवडलेल्या उमेदवाराला शिवसेनेकडून बिनशर्त पाठिंबा मिळावा, असा भाजपाचा प्रयत्न असेल. म्हणूनच हा उमेदवार मूळचा महाराष्ट्रातील असेल, तर शिवसेना व राष्ट्रवादीलाही त्यास पाठिंबा देणे भाग पडेल, असे गणित भाजपा मांडत असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू व ख्यातनाम संगणकतज्ज्ञ डॉ. भटकर यांचे नाव शनिवारी सत्ताधारी वर्तुळात चर्चेत आले.राज्यसभेवरील नियुक्त सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची नावेही राजकीय वर्तुळात असली, तरी उच्चपदस्थ सूत्रांनुसार राष्ट्रपतिपदासाठी निवड करण्यासाठी आवश्यक निकषात चपखल बसणारे नाव या दृष्टीने डॉ. भटकर यांच्या नावाचा विचार केला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डॉ. भटकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घ क्षेत्रातील वादीतीत असे विद्वान आहेत. ‘ल्वदेशी विज्ञाना’चा प्रसार-प्रचार करणाऱ्या ‘विज्ञान भारती’ या संघप्रणीत संस्थेशी डॉ. भटकर बराच काळ संबंधित होते. दिल्ली आयआयटीच्या ‘बोर्ड आॅफ गव्हर्नर’चेही ते अध्यक्ष होते. पुण्यात ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सिडॅक)ची स्थापना करून डॉ. भटकर यांनी ‘सुपर कॉम्प्युटिंग’च्या क्षेत्रात भारताला मानाच्या पंक्तीत बसविले होते. त्यांच्याच प्रयत्नांतून ‘परम ८०००’ व ‘परम १०००००’ हे भारताचे पहिले सुपर कॉम्प्युटर तयार झाले होते. सन २००० मध्ये ‘पद्मश्री’ व सन २०१५ मध्ये ‘पद्मभूषण’ किताबाने त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला. सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यंदाच्या जानेवारीत त्यांची ‘व्हिजिटर’ म्हणून नेमणूक केली.महाजन, स्वराज यांना पर्याय कोण?सुषमा स्वराज आणि सुमित्रा महाजन यांची नावेही संभाव्य उमेदवार म्हणून गांभीर्याने चर्चेत आली होती. स्वराज यांची स्वीकारार्हता व्यापक असून कदाचित काँग्रेसचाही त्यांच्या नावाला पाठिंबा मिळेल, असे मानले गेले. शिवाय गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठीही पुढे केले होते. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावास शिवसेनेचा विरोध असणार नाही, असे मानले जाते. पण मंत्रिमंडळात अनुभवी व बुद्धिमान मंत्र्यांची आधीच वानवा असताना स्वराज यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यास पंतप्रधान मोदी फारसे उत्सूक नसल्याचेही समजते.काही दिवसांपूर्वी सुमित्रा महाजन पंतप्रधानांना भेटल्या तेव्हा त्यांच्या संभाव्य उमेदवारीचा विषय संक्षेपाने चर्चेत आल्याचे सांगितले जाते. पंतप्रधानांनी महाजन यांची स्तुती केली असून सभागृहातील सध्याची रचना पाहता अध्यक्षांच्या खुर्चीत सुमित्राताई नसतील तर लोकसभा चालविणे अत्यंत अवघड जाईल, असे मोदींनी त्यांच्या अपरोक्ष इतरांना बोलून दाखविल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळे सभागृह समर्थपणे चालवू शकेल असे दुसऱ्या कोणाचे तरी नाव लोकसभा अध्यक्षपदासाठी तुम्हीच सुचवा, असे मोदी महाजन यांना म्हणाल्याचेही कळते.विरोध होण्याची शक्यता कमीडॉ. भटकर हे एक वादातीत असे सन्माननीय व्यक्तिमत्त्व असून, त्यांचे नाव पुढे केले, तर त्यास विरोध करण्यास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही कारण असणार नाही, असे भाजपातील श्रेष्ठींना वाटते.डॉ. जाधव यांच्याविषयी साशंकताडॉ. नरेंद्र जाधव हे दलित विचारवंत असल्याने, रा. स्व. संघाच्या शिफारशीवरूनच त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली गेली होती, परंतु त्यांना प्रत्यक्ष संघाच्या कार्याची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रपती भवनात पोहोचण्यासाठी हे कितपत उपयोगी पडेल, याविषयी साशंकताही व्यक्त केली जात आहे.संघाला हवा हिंदुत्ववादीज्यांची हिंदुत्ववादी विचारांशी बांधिलकी आहे, अशी व्यक्ती राष्ट्रपतिपदासाठी निवडली गेलेली आपल्याला आवडेल, असे रा. स्व. संघाच्या नेतृत्वाने भाजपाला स्पष्टपणे कळविले आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वप्रणालीची लढाई आहे व ती काँग्रेस संस्कृतीशी सूतराम संबंध नसलेल्या व्यक्तीनेच जिंकायला हवी, असा संघाचा आग्रह आहे.मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात झालेली भेट ही निव्वळ सदिच्छा भेट होती, अशी संघाच्या केशवकुंज मुख्यालयाने सारवासारव केली होती. स्वत: मुखर्जी यांनी भागवत यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते, असा खुलासाही संघाने केला होता. राष्ट्रपतींचे निमंत्रण झिडकारणे शिष्टाचाराला सोडून झाले असते, म्हणून रुद्रपूरची भेट अर्धवट सोडून भागवत दिल्लीला आले होते. मुखर्जींच्या भेटीनंतर पंतप्रधानांशी फोनवर बोलून भागवत रुद्रपूरला परतले होते, असेही समजते.