शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

डोकलाम वाद; भारताविरूद्ध लष्करी कारवाईच्या विचारात चीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 14:22 IST

सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देडोकलाम मुद्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे.सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे. चीनमधील एका सरकारी वृत्तपत्रात तज्ज्ञांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे

नवी दिल्ली, दि. 5- डोकलाम मुद्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे. चीनमधील एका सरकारी वृत्तपत्रात तज्ज्ञांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे. डोकलाममध्ये चीनकडून रस्त्या बनविण्याच्या झालेल्या प्रयत्नानंतर 16 जूनपासून भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत. चीनची पीपुल्स लिबरेशन आर्मी दोन आठवड्यांच्या आत डोकलाममध्ये भारतीय लष्करावर कारवाई करू शकते, असं मत चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मागील २४ तासांत चीनकडून करण्यात आलेल्या वक्तव्यावरून ही परिस्थिती दिसते आहे, चीन भारतीय लष्कराला चीनच्या भूभागात आणखी काही काळानंतर सहन करू शकणार नाही. दोन आठवड्याच्या आत चीनकडून भारताविरोधात लष्करी ऑपरेशन राबवलं जाऊ शकतं, असं  शांघाय अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांवरचे संशोधक हु जियोंग म्हणाले आहेत.

भारतीय सैनिकांना कैदेत ठेवणं किंवा त्यांना माघार घेण्यास भाग पाडणं, हा चीनच्या कारवाईचा हेतू असेल. त्याचबरोबर चीनच्या विदेश मंत्रालयाकडून या कारवाईपूर्वी भारताला याबाबतची माहिती दिली जाईल, असं ग्लोबल टाइम्सने हु जियोंग यांच्या हवाल्याने म्हटलं आहे.गेल्या २४ तासांत चीनच्या विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, भारतातील चीनचा दुतावास आणि पीपुल्स डेलीकडून सातत्याने भारताला धमकी दिली जात आहे. भारताला डोकलाममधील आपलं सैन्य हटवण्यास चीनकडून सांगितलं जात आहे. मागील दोन महिन्यांपासून भारत-चीनचे सैन्य डोकलाममध्ये आमने-सामने उभे आहेत. चीनच्या सरकारी वाहिनीने शुक्रवारी चीनच्या सैन्याने तिबेट येथे युद्धाभ्यास केल्याचं वृत्त दिलं. पहाटे ४ वाजता हा युद्धाभ्यास सुरू झाला होता. यामध्ये शत्रूपक्षाच्या ठिकाणांवर कब्जा करण्याचा सराव करण्यात आला होता.

डोकलाममध्ये चीन लष्कर आयुधे वापरू शकतो, हे चिनी सैन्याच्या युद्धाभ्यासावरून स्पष्ट होतं. कारण भारताची उक्ती आणि कृतीमध्ये खूप फरक आहे, असं सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग म्हणाले आहेत. भारताच्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरूवारी संसदेत युद्धामुळे समस्येचे निवारण होऊ शकत नसल्याचं म्हटले होते. यासाठी चर्चेची आवश्यकता असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर भारत कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.