शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

डोकलाम वाद; भारताविरूद्ध लष्करी कारवाईच्या विचारात चीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 14:22 IST

सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देडोकलाम मुद्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे.सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे. चीनमधील एका सरकारी वृत्तपत्रात तज्ज्ञांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे

नवी दिल्ली, दि. 5- डोकलाम मुद्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे. चीनमधील एका सरकारी वृत्तपत्रात तज्ज्ञांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे. डोकलाममध्ये चीनकडून रस्त्या बनविण्याच्या झालेल्या प्रयत्नानंतर 16 जूनपासून भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत. चीनची पीपुल्स लिबरेशन आर्मी दोन आठवड्यांच्या आत डोकलाममध्ये भारतीय लष्करावर कारवाई करू शकते, असं मत चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मागील २४ तासांत चीनकडून करण्यात आलेल्या वक्तव्यावरून ही परिस्थिती दिसते आहे, चीन भारतीय लष्कराला चीनच्या भूभागात आणखी काही काळानंतर सहन करू शकणार नाही. दोन आठवड्याच्या आत चीनकडून भारताविरोधात लष्करी ऑपरेशन राबवलं जाऊ शकतं, असं  शांघाय अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांवरचे संशोधक हु जियोंग म्हणाले आहेत.

भारतीय सैनिकांना कैदेत ठेवणं किंवा त्यांना माघार घेण्यास भाग पाडणं, हा चीनच्या कारवाईचा हेतू असेल. त्याचबरोबर चीनच्या विदेश मंत्रालयाकडून या कारवाईपूर्वी भारताला याबाबतची माहिती दिली जाईल, असं ग्लोबल टाइम्सने हु जियोंग यांच्या हवाल्याने म्हटलं आहे.गेल्या २४ तासांत चीनच्या विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, भारतातील चीनचा दुतावास आणि पीपुल्स डेलीकडून सातत्याने भारताला धमकी दिली जात आहे. भारताला डोकलाममधील आपलं सैन्य हटवण्यास चीनकडून सांगितलं जात आहे. मागील दोन महिन्यांपासून भारत-चीनचे सैन्य डोकलाममध्ये आमने-सामने उभे आहेत. चीनच्या सरकारी वाहिनीने शुक्रवारी चीनच्या सैन्याने तिबेट येथे युद्धाभ्यास केल्याचं वृत्त दिलं. पहाटे ४ वाजता हा युद्धाभ्यास सुरू झाला होता. यामध्ये शत्रूपक्षाच्या ठिकाणांवर कब्जा करण्याचा सराव करण्यात आला होता.

डोकलाममध्ये चीन लष्कर आयुधे वापरू शकतो, हे चिनी सैन्याच्या युद्धाभ्यासावरून स्पष्ट होतं. कारण भारताची उक्ती आणि कृतीमध्ये खूप फरक आहे, असं सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग म्हणाले आहेत. भारताच्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरूवारी संसदेत युद्धामुळे समस्येचे निवारण होऊ शकत नसल्याचं म्हटले होते. यासाठी चर्चेची आवश्यकता असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर भारत कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.