शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाम वाद; भारताविरूद्ध लष्करी कारवाईच्या विचारात चीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 14:22 IST

सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देडोकलाम मुद्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे.सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे. चीनमधील एका सरकारी वृत्तपत्रात तज्ज्ञांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे

नवी दिल्ली, दि. 5- डोकलाम मुद्यावरून चीनने पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना तेथून हटविण्यासाठी चीन एका छोटं सैन्य ऑपरेशन करण्याच्या विचारात आहे. चीनमधील एका सरकारी वृत्तपत्रात तज्ज्ञांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे. डोकलाममध्ये चीनकडून रस्त्या बनविण्याच्या झालेल्या प्रयत्नानंतर 16 जूनपासून भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत. चीनची पीपुल्स लिबरेशन आर्मी दोन आठवड्यांच्या आत डोकलाममध्ये भारतीय लष्करावर कारवाई करू शकते, असं मत चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मागील २४ तासांत चीनकडून करण्यात आलेल्या वक्तव्यावरून ही परिस्थिती दिसते आहे, चीन भारतीय लष्कराला चीनच्या भूभागात आणखी काही काळानंतर सहन करू शकणार नाही. दोन आठवड्याच्या आत चीनकडून भारताविरोधात लष्करी ऑपरेशन राबवलं जाऊ शकतं, असं  शांघाय अॅकेडमी ऑफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांवरचे संशोधक हु जियोंग म्हणाले आहेत.

भारतीय सैनिकांना कैदेत ठेवणं किंवा त्यांना माघार घेण्यास भाग पाडणं, हा चीनच्या कारवाईचा हेतू असेल. त्याचबरोबर चीनच्या विदेश मंत्रालयाकडून या कारवाईपूर्वी भारताला याबाबतची माहिती दिली जाईल, असं ग्लोबल टाइम्सने हु जियोंग यांच्या हवाल्याने म्हटलं आहे.गेल्या २४ तासांत चीनच्या विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, भारतातील चीनचा दुतावास आणि पीपुल्स डेलीकडून सातत्याने भारताला धमकी दिली जात आहे. भारताला डोकलाममधील आपलं सैन्य हटवण्यास चीनकडून सांगितलं जात आहे. मागील दोन महिन्यांपासून भारत-चीनचे सैन्य डोकलाममध्ये आमने-सामने उभे आहेत. चीनच्या सरकारी वाहिनीने शुक्रवारी चीनच्या सैन्याने तिबेट येथे युद्धाभ्यास केल्याचं वृत्त दिलं. पहाटे ४ वाजता हा युद्धाभ्यास सुरू झाला होता. यामध्ये शत्रूपक्षाच्या ठिकाणांवर कब्जा करण्याचा सराव करण्यात आला होता.

डोकलाममध्ये चीन लष्कर आयुधे वापरू शकतो, हे चिनी सैन्याच्या युद्धाभ्यासावरून स्पष्ट होतं. कारण भारताची उक्ती आणि कृतीमध्ये खूप फरक आहे, असं सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग म्हणाले आहेत. भारताच्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी गुरूवारी संसदेत युद्धामुळे समस्येचे निवारण होऊ शकत नसल्याचं म्हटले होते. यासाठी चर्चेची आवश्यकता असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर भारत कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.