शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

केंद्रानं दिली स्थगिती; केजरीवाल म्हणाले, "आम्ही रेशन योजनेचं नाव बदलायला तयार, क्रेडिटही नको"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 17:07 IST

Arvind Kejriwal : केंद्राच्या निर्णयानंतर केजरीवाल यांनी योजनेवरून नाव हटवण्याच्या केल्या सूचना

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात या योजनेची केली होती घोषणाकेंद्रानं पत्र लिहून दिल्ली सरकारला योजना सुरू न करण्याचे दिले होते निर्देश

केंद्रातील मोदी सरकारनंदिल्लीतीलअरविंद केजरीवालसरकारला मोठा झटका दिला होता. दिल्ली आम आदमी सरकारकडून 'मुख्यमंत्री - प्रत्येक घरात रेशन' ही योजना सुरू करण्यात येणार होती. येत्या २५ मार्चपासून ही योजना दिल्लीत सुरू होणार होती. परंतु दिल्ली सरकारच्या या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर केंद्र सरकारनं स्थगिती आणली. केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहून ही योजना सुरू न करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, यानंतर अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी एका समीक्षा बैठकीचं आयोजन केलं होतं. तसंच ही योजना कशा प्रकारे सुरू करता येईल यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान त्यांनी या योजनेवरून नावदेखील हटवण्याचा पर्याय सूचवला.

केंद्र सरकारनं दिल्लीत २५ मार्चपासून सुरू होणाऱ्या रेशनच्या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर स्थगिती आणली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत केंद्र सरकार राज्यांना रेशन देत असतं. यामुळे यात कोणताही बदल करता येणार नसल्याचं केंद्रानं म्हटलं म्हटलं होतं. यानंतर केजरीवाल यांनी बैठक घेतल्यानंतर याबाबत माहिती दिली. "दिल्ली सरकारनं अनेकांशी चर्चा केल्यानंतर यावर मार्ग काढला होता. जेवढा गहू लोकांना देण्यात येतो तितकंच पीठ आणि जेवढा तांदूळ दिला जातो तो पिशवीतून लोकांच्या घरी पोहोचवण्याचा पर्याय समोर आला होता. यामुळे लोकांच्या समस्याही कमी होतील असा दावा दिल्ली सरकारनं केला होता. हाच विचार करून मुख्यमंत्री प्रत्येक घरात रेशन योजना सुरू करण्यात येणार होती. परंतु शुक्रवारी सरकारकडून आम्हाला एक पत्र आलं. यात तुम्ही ही योजना लागू करु शकत नसल्याचं म्हटलं होतं. ही योजना २५ मार्चपासून सुरू होणार होती. परंतु हे ऐकून आम्हाला धक्का बसला," असं केजरीवाल म्हणाले.योजनेवरून नाव हटवण्याच्या सूचना"आज सकाली मी अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली. तसंच या योजनेवरून नाव हचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या योजनेचं कोणतंही नाव नसेल. जे रेशन येत होतं ते पहिले दुकांनांच्या द्वारे दिलं जात होतं. आता आम्ही ते थेट घराघरात पोहोचवू. आम्हाला कोणाचंही नाव किंवा क्रेडिट घेण्यात पडायचं नाही. या निर्णयानंतर मला असं वाटतं की केंद्र सरकारला ज्या समस्या होत्या त्या दूर होती आणि ही योजना सुरू करण्याची आम्हाला मंजुरी मिळेल," असं केजरीवाल म्हणाले. गेल्या आठवड्यात केली होती घोषणा

केजरीवाल सरकारनं गेल्याच आठवड्यात २५ मार्चपासून रेशनची डोअर स्टेप डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीमापुरी सर्कल भागातील १०० घरांमधअये रेशन पोहोचवण्यासोबतच मुख्यमंत्री प्रत्येक घरात योजनेचा २५ मार्च रोजी शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला होता. अन्य क्षेत्रांमध्ये ही योजना १ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार होती. ही योजना सुरू केल्यानंतर दिल्लीत रेशनमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी रेशन माफियांचा अंत करण्यासाठी मदत मिळणार असल्याचा दावा केजरीवाल सरकारनं केला होता. ही योजना यापूर्वीच सुरू करण्यात येणार होती. परंतु बायोमॅट्रिक मशीन लावण्याचं काम पूर्ण न झाल्यानं ही योजना पुढे ढकलण्यात आली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालGovernmentसरकारdelhiदिल्लीfoodअन्न