शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रानं दिली स्थगिती; केजरीवाल म्हणाले, "आम्ही रेशन योजनेचं नाव बदलायला तयार, क्रेडिटही नको"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 17:07 IST

Arvind Kejriwal : केंद्राच्या निर्णयानंतर केजरीवाल यांनी योजनेवरून नाव हटवण्याच्या केल्या सूचना

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात या योजनेची केली होती घोषणाकेंद्रानं पत्र लिहून दिल्ली सरकारला योजना सुरू न करण्याचे दिले होते निर्देश

केंद्रातील मोदी सरकारनंदिल्लीतीलअरविंद केजरीवालसरकारला मोठा झटका दिला होता. दिल्ली आम आदमी सरकारकडून 'मुख्यमंत्री - प्रत्येक घरात रेशन' ही योजना सुरू करण्यात येणार होती. येत्या २५ मार्चपासून ही योजना दिल्लीत सुरू होणार होती. परंतु दिल्ली सरकारच्या या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर केंद्र सरकारनं स्थगिती आणली. केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहून ही योजना सुरू न करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, यानंतर अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी एका समीक्षा बैठकीचं आयोजन केलं होतं. तसंच ही योजना कशा प्रकारे सुरू करता येईल यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान त्यांनी या योजनेवरून नावदेखील हटवण्याचा पर्याय सूचवला.

केंद्र सरकारनं दिल्लीत २५ मार्चपासून सुरू होणाऱ्या रेशनच्या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर स्थगिती आणली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत केंद्र सरकार राज्यांना रेशन देत असतं. यामुळे यात कोणताही बदल करता येणार नसल्याचं केंद्रानं म्हटलं म्हटलं होतं. यानंतर केजरीवाल यांनी बैठक घेतल्यानंतर याबाबत माहिती दिली. "दिल्ली सरकारनं अनेकांशी चर्चा केल्यानंतर यावर मार्ग काढला होता. जेवढा गहू लोकांना देण्यात येतो तितकंच पीठ आणि जेवढा तांदूळ दिला जातो तो पिशवीतून लोकांच्या घरी पोहोचवण्याचा पर्याय समोर आला होता. यामुळे लोकांच्या समस्याही कमी होतील असा दावा दिल्ली सरकारनं केला होता. हाच विचार करून मुख्यमंत्री प्रत्येक घरात रेशन योजना सुरू करण्यात येणार होती. परंतु शुक्रवारी सरकारकडून आम्हाला एक पत्र आलं. यात तुम्ही ही योजना लागू करु शकत नसल्याचं म्हटलं होतं. ही योजना २५ मार्चपासून सुरू होणार होती. परंतु हे ऐकून आम्हाला धक्का बसला," असं केजरीवाल म्हणाले.योजनेवरून नाव हटवण्याच्या सूचना"आज सकाली मी अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली. तसंच या योजनेवरून नाव हचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या योजनेचं कोणतंही नाव नसेल. जे रेशन येत होतं ते पहिले दुकांनांच्या द्वारे दिलं जात होतं. आता आम्ही ते थेट घराघरात पोहोचवू. आम्हाला कोणाचंही नाव किंवा क्रेडिट घेण्यात पडायचं नाही. या निर्णयानंतर मला असं वाटतं की केंद्र सरकारला ज्या समस्या होत्या त्या दूर होती आणि ही योजना सुरू करण्याची आम्हाला मंजुरी मिळेल," असं केजरीवाल म्हणाले. गेल्या आठवड्यात केली होती घोषणा

केजरीवाल सरकारनं गेल्याच आठवड्यात २५ मार्चपासून रेशनची डोअर स्टेप डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीमापुरी सर्कल भागातील १०० घरांमधअये रेशन पोहोचवण्यासोबतच मुख्यमंत्री प्रत्येक घरात योजनेचा २५ मार्च रोजी शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला होता. अन्य क्षेत्रांमध्ये ही योजना १ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार होती. ही योजना सुरू केल्यानंतर दिल्लीत रेशनमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी रेशन माफियांचा अंत करण्यासाठी मदत मिळणार असल्याचा दावा केजरीवाल सरकारनं केला होता. ही योजना यापूर्वीच सुरू करण्यात येणार होती. परंतु बायोमॅट्रिक मशीन लावण्याचं काम पूर्ण न झाल्यानं ही योजना पुढे ढकलण्यात आली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालGovernmentसरकारdelhiदिल्लीfoodअन्न