शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"राजकारण करायचं नाही, पण हाथरस प्रकरणी प्रशासनाच्या अनेक चुका, आर्थिक मदत द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 08:04 IST

मृतांच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली भेट

जितेंद्र प्रधान

हाथरस : हाथरस येथील चेंगराचेंगरी प्रकरणात प्रशासनाच्या अनेक चुका झाल्या आहेत, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मात्र या मुद्द्यावर मला राजकारण करायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हाथरस दुर्घटनेतील पीडितांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले.

चेंगराचेंगरीमध्ये मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांची राहुल गांधी यांनी हाथरस व अलिगढ येथे शुक्रवारी भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, एखाद्या दुर्घटनेत इतकी मोठी जीवितहानी होणे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे आघात सहन करावे लागले, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. प्रशासनाने काही चुका केल्या हे सदर दुर्घटनेकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. प्रशासनाच्या काय चुका झाल्या ते उत्तर प्रदेश सरकारने शोधले पाहिजे. धार्मिक गुरू भोलेबाबाच्या सत्संगात २ जुलै रोजी चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोपीच्या घरी राहायचा भोलेबाबा

हाथरसमध्ये ज्या भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली, त्याचा भक्त हा राजस्थानातील प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणातील आरोपी आहे. भोलेबाबा राजस्थानला आला की, या आरोपीच्या घरीच राहात असे. दौसामध्ये जिथे भोलेबाबाचा आश्रम होता ती जागा पोलिसांनी जप्त केली आहे. 

बाबा नारायण हरि साकार ऊर्फ सूरजपाल ऊर्फ भोलेबाबा याचा राजस्थानातील दौसा येथील आग्रा रोडवर गोविंद देवजी मंदिराच्या समोर आश्रम आहे. ही वास्तू पटवारी हर्षवर्धन मीणा याच्या मालकीची आहे. हर्षवर्धन २०२० साली झालेल्या जेईएन भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फोडल्याच्या प्रकरणातील आरोपी आहे. यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये पोलिसांनी या आश्रमावर धाड टाकली. ही मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यानंतर भोलेबाबा या ठिकाणी कधीही आला नाही. 

पूर्वी भोलेबाबाचा सत्संग होत असलेल्या आश्रमाच्या इमारतीवर एक फलक आहे. त्यावर लिहिले आहे की, भोलेबाबा सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हवापालटासाठी काही ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे सत्संगाचे आयोजन करण्यात आलेले नाही. आश्रमाच्या वास्तूचा मालक हर्षवर्धन हा परीक्षा गैरप्रकारांतील आरोपी असल्याने याची तपास यंत्रणांची दखल घेतली आहे.

अश्रूंना करून दिली वाट...तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य आहात, असे राहुल गांधी यांनी  मृतांच्या नातेवाइकांना सांगितले. राहुल गांधी यांना पाहताच पीडित कुटुंबीयांपैकी काही जण त्यांना बिलगले व अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ