शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

'कोरोना लसीच्या उत्साहात चीनची घुसखोरी अन् अर्थव्यवस्था विसरु नका'

By महेश गलांडे | Updated: January 5, 2021 14:49 IST

सरकारने कोरोना लसीच्या उत्साहात चीनने भारतीय सीमाहद्दीत केलेल्या 4 हजार स्वेअर किमीचा कब्जा केलाय, ते विसरता कामा नये. तसेच, देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींनी काही दिवसांपूर्वी ट्विट करुन लसीचे टेंडर विदेशी कंपनीला दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीने तिसऱ्या टप्प्यात 13,000 व्यक्तींचे परिक्षण केले होते.

नवी दिल्ली - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी नेहमीच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पाहायला मिळते. सत्तेतील भाजपा सरकारला घरचा अहेर देण्याचं काम स्वामी करतात. आताही, स्वांमींनी कोरोना लसीच्या घोषणेवरुन मोदी सरकारला मोलाचा सल्ला दिलाय. कोरोना लसीच्या उत्साहात चीनच्या अतिक्रमणाला आणि अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा विसरु नका, असा खोचक टोमणाच स्वामींनी मारला आहे. 

सरकारने कोरोना लसीच्या उत्साहात चीनने भारतीय सीमाहद्दीत केलेल्या 4 हजार स्वेअर किमीचा कब्जा केलाय, ते विसरता कामा नये. तसेच, देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. चीनच्या पीपुल्स आर्मीने एलएसीजवळ 30 आधुनिक टँक उभारले असून भारतीय हद्दीत हल्ला करण्यासाठी चीन तयार असल्याचं स्वामींनी म्हटलंय. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये सीमा रेषेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय अधिकारी आणि सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांची चर्चाही झाली आहे. मात्र, अद्यापही दोन्ही देशांच्या सीमारेषेवरील तणाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. चीनने भारताच्या हद्दीतील लडाखच्या गलवाघ घाटीत रोड निर्माण करण्यास हरकत घेतली होती. त्यावरुन 5 मे रोजी भारत आणि चीनी सैन्यात हाणामारी झाली होती, त्यातूनच 15 जून रोजी चीन आणि भारत देशाच्या सैन्यांत हिंसाचार घडला. त्यामध्ये भारतीय सैन्य दलाचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे, सुब्रमण्यम स्वामींनी पुन्हा एकदा सरकारला येथील परिस्थितीची आठवण करुन दिलीय. 

सुब्रमण्यम स्वामींनी काही दिवसांपूर्वी ट्विट करुन लसीचे टेंडर विदेशी कंपनीला दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीने तिसऱ्या टप्प्यात 13,000 व्यक्तींचे परिक्षण केले होते. तर, ब्रिटीश लसीच्या कंपनीने केवळ 1200 लोकांचीच चाचणी केली होती. तरीही हे कॉन्ट्रॅक्ट भारतीय कंपनीऐवजी इंग्रजी कंपनीला देण्यात आले. यासह, स्वामींनी पीएमओ कार्यालयात काम करत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पीएमओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यामुळे, पंतप्रधानांनी सर्वप्रथम पूर्वीच्या पीएसएला हटविले पाहिजे, अशी मागणी स्वामींनी केली होती. 

पेट्रोल दरवाढीवरुनही सरकारवरुनही केली होती टीका 

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पेट्रोलचे दर देशात 90 रुपये प्रति लिटर झाले असून ती देशातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक असल्याचं म्हटलं होतं. पेट्रोलचं एक्स रिफायनरी मूळ किंमत 30 रुपये प्रति लिटर एवढी आहे. मात्र, सर्व प्रकारचे टॅक्स आणि पेट्रोल पंपाचे कमिशन मिळून ही किंमत 60 रुपयांनी वाढते. त्यामुळे, पेट्रोलचे प्रति लिटर दर 90 रुपये एवढे आहेत. माझ्या मते पेट्रोलच जास्तीत जास्त किंमत 40 रुपये प्रति लिटर असणे आवश्यक आहे, असेही स्वामींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं होतं.   

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीCorona vaccineकोरोनाची लसchinaचीनladakhलडाख