शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

पुलवामातील शहिदांच्या कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मदतनिधीचं काय झालं?; वाचून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 07:39 IST

प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यातून एक दिवसाचं वेतन वजा झालं; पण...

आग्रा: फेब्रुवारीत जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये ४० जवान शहीद झाले. यानंतर सरकारनं शहिदांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली. आग्रा प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं एक दिवसाचं वेतन देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम वजा झाली. मात्र पुलवामा हल्ल्याला सात महिने उलटूनही शहिदांच्या कुटुंबीयांना ही मदत मिळालीच नाही. आग्रा प्रशासनाच्या विविध विभागांनी शहिदांच्या कुटुंबांना मदत म्हणून एक दिवसाचं वेतन देऊ केलं होतं. त्यांच्या पगारातून कापण्यात आलेली ही रक्कम आता पुन्हा त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे आग्रा प्रशासनातील १५ विभागातील कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रशासनाच्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांसह मुख्य विकास अधिकाऱ्यांनी शहिदांसाठी २.७० लाखांची मदत उभी केली होती. मात्र ती शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलीच नाही. 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्त संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापण्यात आलेल्या रकमेत काहीतरी अनियमितता असल्याचं मुख्य विकास अधिकारी असलेल्या जे. रिभा यांना सांगितलं. मी पदभार स्वीकारण्यापूर्वी हा प्रकार घडला. अनियमितता आढळून आल्यानं तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कापण्यात आलेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी स्वच्छेनं त्यांचं एक दिवसाचं वेतन शहिदांच्या कुटुंबीयांना देऊ केलं होतं. त्यामुळे ही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी होती, असं रिभा म्हणाल्या. कापण्यात आलेलं एक दिवसाचं वेतन पुन्हा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय झाल्यानंतर ही बाब माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. 
शहिदांच्या कुटुंबांपर्यंत न पोहोचलेली मदत पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती एका प्रशासकीय कर्मचाऱ्यानं दिली. कर्मचाऱ्यांनी गोळा केलेली मदत पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी डिमांड ड्राफ्टदेखील तयार करण्यात आला. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याचं या कर्मचाऱ्यानं सांगितलं. त्यानंतर ही रक्कम हल्ल्यात वीरमरण आलेल्या कौशल कुमार यांच्या स्मारकासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यांच्या स्मारकाचं काम एमपीएलएडी अंतर्गत आधीपासूनच सुरू असल्यानं तो विचारदेखील रद्द करण्यात आला. यानंतर जवळपास दोन महिने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून गोळा करण्यात आलेली रक्कम बँक खात्यात पडून होती. हा मुद्दा कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं उपस्थित केल्यानंतर ती रक्कम पुन्हा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीद